शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

ज्या तरूणीच्या हत्येसाठी 7 वर्षांपासून तुरूंगात बंद आहे तरूण, ती आता सापडली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:39 IST

Crime News : काही दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या  अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

Crime News : उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. ज्या तरूणीच्या हत्येप्रकरणी आणि अपहरणाप्रकरणी एक तरूण 7 वर्षापासून तुरूंगात बंद आहे, ती पोलिसांना जिवंत सापडली आहे. पोलिसांना समजलं की, तरूणी हाथरसमध्ये पती आणि दोन मुलांसह राहत आहे. पोलिसांनी तिला लगेच अटक करून कोर्टात हजर केलं. तुरूंगात बंद असलेल्या विष्णुच्या आईने कोर्टाकडे आता न्यायाची मागणी केली आहे.

काही दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या  अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पण मुळात ती तरूणी जिवंत आहे. इतकंच नाही तर ती तिचा पती आणि दोन मुलांसोबत आरामात जगत आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई करत तरूणीला अटक केली.

पोलिसांनी सांगितलं की, 7 फेब्रुवारी 2015 ला 10व्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी गावातील विधवा अनीताचा एकुलता एक मुलगा विष्णुवर संशय व्यक्त केला जात होता. अनेक महिने शोध घेऊनही तरूणी कुठेच सापडली नाही. तेच आग्रा येथे एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावरील कपड्यांच्या आधारावर तिच्या वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं आणि विष्णुवर हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी विष्णुवर या मुलीला फसवूण नेल्याच्या आणि हत्या करून पुरावे मिटवण्याच्या गुन्ह्याखाली 25 सप्टेंबर 2015 ला अटक केली.

काही दिवसांनी विष्णु जामीनावर बाहेर आला. पण केसच्या ट्रायलमुळे त्याला पुन्हा तुरूंगात जावं लागलं. या दरम्यान विष्णुच्या कुटुंबियांनी बेपत्ता तरूणीचा शोध घेणं सुरू केलं आणि त्यांना ती जिवंत असल्याचं समजलं. आरोप आहे की, प्रकरण दाबण्यासाठी मुलीचे कुटुंबिय अनीतावर दबाव टाकत होते. विष्णुच्या आईच्या मागणीनंतर तरूणीला अटक झाली आणि तिला कोर्टात हजर करण्यात आलं.

विष्णुची आई अनीताचा आरोप आहे की, तिच्या मुलाला फसवण्यात आलं आहे. त्याच्यावर आरोप आहे की, गोंडा येथे राहणाऱ्या मुलीला सात वर्षाआधी अपहरण करून आग्रा येथे तिची हत्या केली होती. अनीता म्हणाली की, माझ्या मुलाला फसवण्यात आलं आहे. आता कोर्टाने यावर निर्णय घ्यावा. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस सत्य समोर आणण्यास तयार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी