शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ज्या तरूणीच्या हत्येसाठी 7 वर्षांपासून तुरूंगात बंद आहे तरूण, ती आता सापडली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:39 IST

Crime News : काही दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या  अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

Crime News : उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. ज्या तरूणीच्या हत्येप्रकरणी आणि अपहरणाप्रकरणी एक तरूण 7 वर्षापासून तुरूंगात बंद आहे, ती पोलिसांना जिवंत सापडली आहे. पोलिसांना समजलं की, तरूणी हाथरसमध्ये पती आणि दोन मुलांसह राहत आहे. पोलिसांनी तिला लगेच अटक करून कोर्टात हजर केलं. तुरूंगात बंद असलेल्या विष्णुच्या आईने कोर्टाकडे आता न्यायाची मागणी केली आहे.

काही दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या  अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पण मुळात ती तरूणी जिवंत आहे. इतकंच नाही तर ती तिचा पती आणि दोन मुलांसोबत आरामात जगत आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई करत तरूणीला अटक केली.

पोलिसांनी सांगितलं की, 7 फेब्रुवारी 2015 ला 10व्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी गावातील विधवा अनीताचा एकुलता एक मुलगा विष्णुवर संशय व्यक्त केला जात होता. अनेक महिने शोध घेऊनही तरूणी कुठेच सापडली नाही. तेच आग्रा येथे एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावरील कपड्यांच्या आधारावर तिच्या वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं आणि विष्णुवर हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी विष्णुवर या मुलीला फसवूण नेल्याच्या आणि हत्या करून पुरावे मिटवण्याच्या गुन्ह्याखाली 25 सप्टेंबर 2015 ला अटक केली.

काही दिवसांनी विष्णु जामीनावर बाहेर आला. पण केसच्या ट्रायलमुळे त्याला पुन्हा तुरूंगात जावं लागलं. या दरम्यान विष्णुच्या कुटुंबियांनी बेपत्ता तरूणीचा शोध घेणं सुरू केलं आणि त्यांना ती जिवंत असल्याचं समजलं. आरोप आहे की, प्रकरण दाबण्यासाठी मुलीचे कुटुंबिय अनीतावर दबाव टाकत होते. विष्णुच्या आईच्या मागणीनंतर तरूणीला अटक झाली आणि तिला कोर्टात हजर करण्यात आलं.

विष्णुची आई अनीताचा आरोप आहे की, तिच्या मुलाला फसवण्यात आलं आहे. त्याच्यावर आरोप आहे की, गोंडा येथे राहणाऱ्या मुलीला सात वर्षाआधी अपहरण करून आग्रा येथे तिची हत्या केली होती. अनीता म्हणाली की, माझ्या मुलाला फसवण्यात आलं आहे. आता कोर्टाने यावर निर्णय घ्यावा. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस सत्य समोर आणण्यास तयार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी