शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 18:59 IST

Murder Case : आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी : मृतदेहावर चाकूचे आठ घाव

ठळक मुद्देआबिदची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर धारदार चाकू भोसकल्याने झाल्याची बाब प्राथमिक वैद्यकीय अहवालातून पुढे आली असल्याची माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

चंद्रपूर : वरोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आबिद शेख या विवाहित तरूणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. घटनास्थळी एक बंदुक आढळली होती. मात्र आबिदची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर धारदार चाकू भोसकल्याने झाल्याची बाब प्राथमिक वैद्यकीय अहवालातून पुढे आली असल्याची माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वरोरा शहरातील पंचायत समिती कार्यालयानजिक १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका टिनाच्या शेडखाली आबिद शेख हा बसला असताना दुचाकी वाहनाने आलेल्या देवा नोकरकर व गौरव वाळके या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी एक बंदुक आढळून आली. मात्र आबिदच्या मृतदेहावर धारदार शस्त्राचे आठ घाव आढळून आले. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून दिसून येत असल्याचे उपिवभागीय अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांचे म्हणणे आहे. यावरून मारेकऱ्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या वा नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी देवा नोकरकर व गौरव वाळके या दोन्ही आरोपींना काही तासातच अटक केली. या दोघांनी आबिदची हत्या नेमकी कशासाठी केली, हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आरोपींना वरोरा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी हे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक