शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोनभद्र नरसंहार प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची मोठी कारवाई;  डीएम, एसपींना हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 18:29 IST

हत्याकांडात दहा आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देदोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. .1952 पासून दीर्घकाळापर्यंत काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्याचा खेळ खेळला गेला. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे झालेल्या नरसंहारप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्रचे एसपी सलमान ताज पाटील आणि डीएम अंकीत अग्रवाल यांना तत्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडात दहा आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जमिनीच्या वादातून नरसंहार झालेल्या सोनभद्रमधील उंभा गावाला भेट दिली. त्यानंतर संवाद सधताना सांगितले की, उंभ हत्याकांड प्रकरणी डीएम, एसपी यांच्याबरोबरच आतापर्यंत एक एएसपी, तीन सीओ, महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सात राजपत्रित आणि आठ बिगर राजपत्रित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे." 

दरम्यान, याप्रकरणी 1952 पासून आतापर्यंत जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.1952 पासून दीर्घकाळापर्यंत काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्याचा खेळ खेळला गेला. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते सहभागी होते. मिर्झापूर आणि सोनभद्रमध्ये खोटी सोसायटी बनवून 1 लाख हेक्टर जमिनीवर कब्जा करण्यात आला होता. आता या प्रकरणी एक समिती बनवण्यात आली असून, ती अशा प्रकरणांची चौकशी करेल, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून दहा आदिवासी शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांडUttar Pradeshउत्तर प्रदेश