शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रेयाॅन संच्युरी कंपनीचे संचालक अध्यक्ष चितलांगे यांच्यावर कामगाराचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 19:52 IST

Worker Attacked : उल्हासनगर शहाड गावठाण परिसरात रेयाॅन संच्युरी कंपनी असून कंपनीत ५ हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात.

ठळक मुद्देहल्ल्यात चीतलांगे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहाड येथील रेयाॅन संच्युरी कंपनीचे प्रबंध संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चीतलांगे यांच्यावर अरुण नावाच्या कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात चीतलांगे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली. 

उल्हासनगर शहाड गावठाण परिसरात रेयाॅन संच्युरी कंपनी असून कंपनीत ५ हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. गुरवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अरुण नावाच्या कामगाराने धारदार शस्त्राने कंपनीचे प्रबंध संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला होताच सुरक्षारक्षक व कामगार यांनी अरुण याला ताब्यात घेतले. याप्रकाराने कंपनीत एकच खळबळ उडाली. उल्हासनगर पोलिस परिमंडळचे सहायक पोलीस आयुक्त डी डी टेळे यांच्यासह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अरुण या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली आहे. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास यांच्या सोबत याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त असून कंपनीतील घटने बाबत सविस्तर माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी सविस्तर माहिती देतो. असे म्हणाले. 

रेयाॅन संच्युरी कंपनीचे प्रबंधक संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे, सुबोध दवे यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. तसेच कंपनी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांना संपर्क केला असता, कोणीही प्रतिसाद दिला नाही. तर दुसऱ्या एका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत संपर्क झाला. मात्र त्यांनी झालेल्या घटने बाबत जास्त बोलण्यास नकार दिला. तसेच नाव प्रसिध्द करू नका. असे सांगितले. सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांला राहण्यासाठी निवास (कॉटर्स) स्वस्तात मिळाले नसल्यानें, हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी वेतनात कपात, कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्ती आदी समस्यांनी कामगार नाराज असल्याची प्रतिक्रिया नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली. 

शहरात सर्वात मोठी कंपनी

एकेकाळी १० हजार पेक्षा जास्त कामगार असलेल्या रेयाॅन संच्युरी कंपनीत, आजमितीस ५ हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. कंपनी विविध उपक्रम राबवित असून कंपनीने स्थानिक नागरिक व कामगार यांच्यासाठी प्रसिध्द शहाड विठ्ठल मंदिर बांधले आहे. महापालिकेला कर रूपाने कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र लॉकडाऊन दरम्यान कर्मचाऱ्याच्या वेतनात कंपनीने कपात केल्याने, कामगार नाराजी असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली. मात्र नाव प्रसिध्द करू नका. असे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्ष