शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ओमानमध्ये घरकामासाठी महिलेला डांबले; पाच दिवसांत आणले देशात, विशेष शाखेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:21 IST

पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली.

नालासोपारा : ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा पासपोर्ट घेऊन तिला डांबून ठेवले होते. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळवले. 

वसई कोळीवाड्याच्या साईदत्तनगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजू वर्मा (३०) ही २५ ऑगस्टला मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु, सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असल्याने तिला तेथे नोकरी करायची नव्हती. तसेच तिला भारतात परतायचे होते. परंतु, तिचा पासपोर्ट ओमानमधील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा होता. तो पासपोर्ट परत देण्यास नकार देत होता. ती तीन दिवसांपासून मस्कत, ओमान विमानतळावर थांबली असल्याचे आईने वसई पोलिस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले. 

एजंटचा पासपोर्ट, व्हिसाला नकार 

हा अर्ज वसई पोलिस ठाणे यांच्याकडून विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना मिळताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेल्या अंजू यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजूचा पासपोर्ट दोन वर्षांकरिता वाढविला असून, त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले. 

भारतीय दूतावासाला विनंती

  • पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तिला आश्रय देत तेथील भारतीय दूतावासात पोहोचण्यास सांगितले. 
  • भारतीय दूतावासाने तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तेथील कायद्याप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रद्द केल्याने अंजू ही ९ जानेवारीला सुखरूप भारतात परतली. 
  • ही कामगिरी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक  कुमारगौरव धादवड, महिला सहायक पोलिस निरीक्षक संजीवनी सोलनकर, पोलिस हवालदार मंजूषा गुप्ता व सीमा दाते यांनी पार पाडली.

कंत्राट रद्द शिवाय जाऊ शकत नाही

ओमान देशात असा नियम आहे की, जर कंत्राटावर कामासाठी गेल्यावर जोपर्यंत कामगार कंत्राट रद्द करत नाही, तोपर्यंत तो परत जाऊ शकत नाही. पाठपुरावा केला व त्या महिलेला भारतात सुखरूप आणले, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुमार धादवड यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतPoliceपोलिस