शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

ओमानमध्ये घरकामासाठी महिलेला डांबले; पाच दिवसांत आणले देशात, विशेष शाखेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:21 IST

पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली.

नालासोपारा : ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा पासपोर्ट घेऊन तिला डांबून ठेवले होते. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळवले. 

वसई कोळीवाड्याच्या साईदत्तनगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजू वर्मा (३०) ही २५ ऑगस्टला मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु, सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असल्याने तिला तेथे नोकरी करायची नव्हती. तसेच तिला भारतात परतायचे होते. परंतु, तिचा पासपोर्ट ओमानमधील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा होता. तो पासपोर्ट परत देण्यास नकार देत होता. ती तीन दिवसांपासून मस्कत, ओमान विमानतळावर थांबली असल्याचे आईने वसई पोलिस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले. 

एजंटचा पासपोर्ट, व्हिसाला नकार 

हा अर्ज वसई पोलिस ठाणे यांच्याकडून विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना मिळताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेल्या अंजू यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजूचा पासपोर्ट दोन वर्षांकरिता वाढविला असून, त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले. 

भारतीय दूतावासाला विनंती

  • पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तिला आश्रय देत तेथील भारतीय दूतावासात पोहोचण्यास सांगितले. 
  • भारतीय दूतावासाने तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तेथील कायद्याप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रद्द केल्याने अंजू ही ९ जानेवारीला सुखरूप भारतात परतली. 
  • ही कामगिरी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक  कुमारगौरव धादवड, महिला सहायक पोलिस निरीक्षक संजीवनी सोलनकर, पोलिस हवालदार मंजूषा गुप्ता व सीमा दाते यांनी पार पाडली.

कंत्राट रद्द शिवाय जाऊ शकत नाही

ओमान देशात असा नियम आहे की, जर कंत्राटावर कामासाठी गेल्यावर जोपर्यंत कामगार कंत्राट रद्द करत नाही, तोपर्यंत तो परत जाऊ शकत नाही. पाठपुरावा केला व त्या महिलेला भारतात सुखरूप आणले, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुमार धादवड यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतPoliceपोलिस