शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

ओमानमध्ये घरकामासाठी महिलेला डांबले; पाच दिवसांत आणले देशात, विशेष शाखेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:21 IST

पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली.

नालासोपारा : ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा पासपोर्ट घेऊन तिला डांबून ठेवले होते. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळवले. 

वसई कोळीवाड्याच्या साईदत्तनगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजू वर्मा (३०) ही २५ ऑगस्टला मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु, सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असल्याने तिला तेथे नोकरी करायची नव्हती. तसेच तिला भारतात परतायचे होते. परंतु, तिचा पासपोर्ट ओमानमधील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा होता. तो पासपोर्ट परत देण्यास नकार देत होता. ती तीन दिवसांपासून मस्कत, ओमान विमानतळावर थांबली असल्याचे आईने वसई पोलिस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले. 

एजंटचा पासपोर्ट, व्हिसाला नकार 

हा अर्ज वसई पोलिस ठाणे यांच्याकडून विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना मिळताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेल्या अंजू यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजूचा पासपोर्ट दोन वर्षांकरिता वाढविला असून, त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले. 

भारतीय दूतावासाला विनंती

  • पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तिला आश्रय देत तेथील भारतीय दूतावासात पोहोचण्यास सांगितले. 
  • भारतीय दूतावासाने तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तेथील कायद्याप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रद्द केल्याने अंजू ही ९ जानेवारीला सुखरूप भारतात परतली. 
  • ही कामगिरी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक  कुमारगौरव धादवड, महिला सहायक पोलिस निरीक्षक संजीवनी सोलनकर, पोलिस हवालदार मंजूषा गुप्ता व सीमा दाते यांनी पार पाडली.

कंत्राट रद्द शिवाय जाऊ शकत नाही

ओमान देशात असा नियम आहे की, जर कंत्राटावर कामासाठी गेल्यावर जोपर्यंत कामगार कंत्राट रद्द करत नाही, तोपर्यंत तो परत जाऊ शकत नाही. पाठपुरावा केला व त्या महिलेला भारतात सुखरूप आणले, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुमार धादवड यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतPoliceपोलिस