शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बचतगटाच्या बहाण्याने दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 21:50 IST

नोकरी, वाहने, स्वस्तात सोने देण्याचे दाखविले आमिष

ठळक मुद्दे फसवणूक झालेल्या महिला, नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली आहे.याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आलेले सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दावा केली की, त्या महिलेशी माझा काहीही सबंध नाही.

औरंगाबाद - बचतगटामार्फत स्वस्तात सोने व इतर वस्तू देण्याचे आमिष दाखवून पुंडलिकनगर परिसरातील ५० हून अधिक महिलांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार झाली आहे. फसवणूक झालेल्या महिला, नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली आहे.सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा.पुंडलिकनगर गल्ली नं. ११, मूळ रा.दुध डेअरी जवळ, शिवाजीनगर, निलंगा जि.लातूर) असे सदरील महिलेचे नाव आहे. परभणीत राहणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सुरेखा म्हेत्रे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती फसवणुक झालेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारीद्वारे दिली आहे. नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे, महिलांना पिठाणी गिरणी, शिलाई मशीन, घरगुती वस्तू मूळ किंमतीपेक्षा कमी दराने देऊन सुरेखा म्हेत्रे हिने सर्वांशी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर बचतगटामार्फत दुचाकी योजना आणली. १० महिलांच्या नावावर रक्कम ठेवा, गावंडे हे आपल्याला सबसिडी देतात, त्यानंतर शोरुमला रक्कम जमा झाली की दुचाकी मिळते. त्यावरून अनेकांनी तिच्याकडे रक्कम गुंतविली. तशीच चारचाकी वाहनांची योजना त्या महिलेने आणली. अनेक गाड्या स्वत: गावंडे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आल्या. सर्व योजना माज्या सहीने मंजुर होतात, योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हेत्रे यांच्याकडे रोख रक्कम द्या, तुमचा फायदा होईल. असे गावंडे यांना लाभार्थ्यांना वारंवार सांगायचे.सेवानिवृत्त झाल्यानंतर गावंडे हे सुरेखा म्हेत्रे यांच्याकड पुंडलिकनगर येथील घरी वास्तव्यास यायचे. अमीषाला बळी पडलेल्या नागरिकांना गावंडे यांनी नेहमी काहीही फसवुणक होणार नाही, तुमचा फायदाच होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी सुरेखा म्हेत्रेकडे चेकद्वारे, आरटीजीएस आणि रोख रक्कम दिली. या सगळ्या प्रकरणात फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गावंडे यांना नागरिकांनी संपर्क केला असता ते त्या महिलेला घेऊन १९ ऑगस्ट रोजी करमाड परिसरातील एका हॉटेलवर आले. आठ दिवसांत सर्वांची रक्कम देण्याचे आश्वासन गावंडे यांनी दिले. यानंतर ते दोघे एका कारमधून दोघेही निघून गेले. १९ ते २८ ऑगस्टपर्यंत सुरेखा म्हेत्रे हिने नागरिकांना झालेल्यांना रक्कम बँक खात्यावर टाकण्याचे आश्वासन देत झुलवत ठेवले. पोलीसांत तक्रार करू नका, गावंडे यांना याप्रकरणात घेऊ नका, नाहीतर पैसे बुडाले म्हणून समजा, अशी धमकी तिने नागरिकांना दिली.सुरेखा म्हेत्रेचे सर्व मोबाईल क्रमांक व तिचे रक्कम गोळा करण्याचे तंत्र तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांपैकी काहींचे ३० लाख, कुणाचे १० लाख तर कुणाचे २१ लाख अशी रक्कम त्या महिलेने अ‍ॅक्सीस व इंडसइंड बँकेच्या खात्यावर जमा केली. अनेकांनी आरटीजीएस, धनादेशाद्वारे रक्कम दिली आहे. त्या महिलेने रक्कम परत करण्यासाठी दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत. १५ ऑगस्टपासून सदरील महिला परिसरातून फरार झाली असून तिचा शोध लागत नसल्यामुळे फसवणुक झालेल्या सर्व नागरिकांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. यावेळी नागरिकांसोबत माजी खा.चंद्रकांत खैरे, पुर्व विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आलेले सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दावा केली की, त्या महिलेशी माझा काहीही सबंध नाही. सदरील महिला फक्त ओळखीची होती. त्यामुळे तिने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली आहे. माझा व त्या महिलेचा काहीही संबंध नाही.

अनेकांची फसवणुकीची शक्यतानेमका हा काय प्रकार आहे, बाजारभावापेक्षा कमी किंमतीत वस्तू देण्यासाठी कोणत्या योजनेचा वापर सुरेखा म्हेत्रेने केला. या जोडगोळीसोबत आणखी कोण आहे. आणखी किती नागरिकांची अशी फसवणूक झाली आहे. यासाठी पोलीसांनी सदर महिलेला ताब्यात घेण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादWomenमहिला