शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बचतगटाच्या बहाण्याने दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 21:50 IST

नोकरी, वाहने, स्वस्तात सोने देण्याचे दाखविले आमिष

ठळक मुद्दे फसवणूक झालेल्या महिला, नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली आहे.याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आलेले सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दावा केली की, त्या महिलेशी माझा काहीही सबंध नाही.

औरंगाबाद - बचतगटामार्फत स्वस्तात सोने व इतर वस्तू देण्याचे आमिष दाखवून पुंडलिकनगर परिसरातील ५० हून अधिक महिलांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार झाली आहे. फसवणूक झालेल्या महिला, नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली आहे.सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा.पुंडलिकनगर गल्ली नं. ११, मूळ रा.दुध डेअरी जवळ, शिवाजीनगर, निलंगा जि.लातूर) असे सदरील महिलेचे नाव आहे. परभणीत राहणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सुरेखा म्हेत्रे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती फसवणुक झालेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारीद्वारे दिली आहे. नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे, महिलांना पिठाणी गिरणी, शिलाई मशीन, घरगुती वस्तू मूळ किंमतीपेक्षा कमी दराने देऊन सुरेखा म्हेत्रे हिने सर्वांशी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर बचतगटामार्फत दुचाकी योजना आणली. १० महिलांच्या नावावर रक्कम ठेवा, गावंडे हे आपल्याला सबसिडी देतात, त्यानंतर शोरुमला रक्कम जमा झाली की दुचाकी मिळते. त्यावरून अनेकांनी तिच्याकडे रक्कम गुंतविली. तशीच चारचाकी वाहनांची योजना त्या महिलेने आणली. अनेक गाड्या स्वत: गावंडे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आल्या. सर्व योजना माज्या सहीने मंजुर होतात, योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हेत्रे यांच्याकडे रोख रक्कम द्या, तुमचा फायदा होईल. असे गावंडे यांना लाभार्थ्यांना वारंवार सांगायचे.सेवानिवृत्त झाल्यानंतर गावंडे हे सुरेखा म्हेत्रे यांच्याकड पुंडलिकनगर येथील घरी वास्तव्यास यायचे. अमीषाला बळी पडलेल्या नागरिकांना गावंडे यांनी नेहमी काहीही फसवुणक होणार नाही, तुमचा फायदाच होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी सुरेखा म्हेत्रेकडे चेकद्वारे, आरटीजीएस आणि रोख रक्कम दिली. या सगळ्या प्रकरणात फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गावंडे यांना नागरिकांनी संपर्क केला असता ते त्या महिलेला घेऊन १९ ऑगस्ट रोजी करमाड परिसरातील एका हॉटेलवर आले. आठ दिवसांत सर्वांची रक्कम देण्याचे आश्वासन गावंडे यांनी दिले. यानंतर ते दोघे एका कारमधून दोघेही निघून गेले. १९ ते २८ ऑगस्टपर्यंत सुरेखा म्हेत्रे हिने नागरिकांना झालेल्यांना रक्कम बँक खात्यावर टाकण्याचे आश्वासन देत झुलवत ठेवले. पोलीसांत तक्रार करू नका, गावंडे यांना याप्रकरणात घेऊ नका, नाहीतर पैसे बुडाले म्हणून समजा, अशी धमकी तिने नागरिकांना दिली.सुरेखा म्हेत्रेचे सर्व मोबाईल क्रमांक व तिचे रक्कम गोळा करण्याचे तंत्र तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांपैकी काहींचे ३० लाख, कुणाचे १० लाख तर कुणाचे २१ लाख अशी रक्कम त्या महिलेने अ‍ॅक्सीस व इंडसइंड बँकेच्या खात्यावर जमा केली. अनेकांनी आरटीजीएस, धनादेशाद्वारे रक्कम दिली आहे. त्या महिलेने रक्कम परत करण्यासाठी दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत. १५ ऑगस्टपासून सदरील महिला परिसरातून फरार झाली असून तिचा शोध लागत नसल्यामुळे फसवणुक झालेल्या सर्व नागरिकांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. यावेळी नागरिकांसोबत माजी खा.चंद्रकांत खैरे, पुर्व विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आलेले सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दावा केली की, त्या महिलेशी माझा काहीही सबंध नाही. सदरील महिला फक्त ओळखीची होती. त्यामुळे तिने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली आहे. माझा व त्या महिलेचा काहीही संबंध नाही.

अनेकांची फसवणुकीची शक्यतानेमका हा काय प्रकार आहे, बाजारभावापेक्षा कमी किंमतीत वस्तू देण्यासाठी कोणत्या योजनेचा वापर सुरेखा म्हेत्रेने केला. या जोडगोळीसोबत आणखी कोण आहे. आणखी किती नागरिकांची अशी फसवणूक झाली आहे. यासाठी पोलीसांनी सदर महिलेला ताब्यात घेण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादWomenमहिला