शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:06 IST

इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणाला कंटाळून तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी म्हणून वयाच्या ७० वर्षी एका आजोबांनी पुनश्च हरिओम करण्याचे ठरवले. आयुष्यावर आलेल्या एकटेपणाच्या लॉकडाऊनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळवले. परंतु, लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला.इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.मूळचे राजस्थानचे असलेले आजोबा उत्तर मुंबईत राहतात. २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने आजोबा निराधार झाले. हृदयाचा, फुप्फुसाचा व किडनीचा आजार असल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत होते. नातेवाईक दूर राहत असल्याने त्यांचीही काही मदत होत नव्हती. म्हणून मग मित्राच्या सल्ल्याने पुन्हा लग्न करण्याचे आजोबांनी ठरवले.त्याच्याच ओळखीतून जयपूर येथील ४४ वर्षीय घटस्फोटित महिलेचे स्थळ आले. आजोबांना स्थळ पसंत पडले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती महिला आईवडिलांसोबत घरी आली. मित्राने लगोलग लग्न उरकण्यास सांगितले. दुसºयाच दिवशी त्यांनी विवाह कार्यालय गाठले. तेथे काही कारणास्तव हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला नाही. फक्त औपचारिकता पूर्ण करण्यात आली. राजस्थानात जाऊन कायदेशीर पद्धतीने विवाह करण्याचे ठरले. मग जीवाची मुंबई करायची म्हणून ते सगळे आजोबांच्या घरात थांबले. आजोबांनी चाव्या त्या बार्इंच्या हाती सोपवल्या. पुढे राजस्थानला जाऊन विवाह नोंदणीसाठी अर्ज केला. महिनाभराने त्या महिलेने आजोबांच्या गावी येत सर्व मालमत्ता पाहून घेतली.येथे मुंबईला परतलेल्या आजोबांना मालमत्तेची कागदपत्रे गायब असल्याचे लक्षात आले. अधिक शोधाशोध केली तर दीड लाख रुपये, लाखोंचे दागिनेही गायब झाल्याचे समजले. आजोबांनी चौकशीसाठी त्या महिलेला फोन केला. मात्र त्या बार्इंनी फोन घेतला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची आजोबांची खात्री झाली. त्यांनी लगोलग पोलिसांकडे तक्रार केली.गुन्हा दाखलगेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात ही फसवणूक झाली. पोलिसांनी या मंगळवारी गुन्हा दाखल केला. दीड लाख रुपयांसह दागिने आणि घराची कागदपत्रे असे एकूण २८ लाख २९ हजार रुपयांवर महिलेने डल्ला मारला. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकड़ूनच अपेक्षा पोलिसांकड़ून तपास सुरू आहे. लवकरच कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत आजोबांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नSenior Citizenज्येष्ठ नागरिक