शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडामुळे वाई तालुका पुन्हा हादरला, साताऱ्यातून अपहरण करून महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 21:56 IST

Crime News : पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, कारी (ता. सातारा) येथील संध्या विजय शिंदे या ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झाल्या होत्या.

पाचवड : सातारा येथून बेपत्ता असलेल्या विवाहितेच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला भुइंज पोलिसांनी बेळगावमध्ये बेड्या ठोकल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २०१९ मध्ये पत्नीचाही खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. या कबुलीमुळे पोलिसांबरोबरच वाई तालुका पुन्हा हादरला आहे. यामुळे सर्वांना वाई येथील संतोष पोळ हत्याकांडाची आठवण झाली. २०१९ मध्ये खून करून पुरलेला मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. नितीन आनंदराव गोळे (वय ३८), असे अटक केेलेल्या व्यक्तीचे नाव असून, मनीषा नितीन गोळे (३४, रा. व्याजवाडी, ता. वाई) व संध्या विजय शिंदे (३४, रा. कारी, ता.जि. सातारा), अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.

पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, कारी (ता. सातारा) येथील संध्या विजय शिंदे या ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झाल्या होत्या. याची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, मंगळवार, दि. ३ रोजी सायंकाळी पाच वाजता भुइंज पोलीस ठाणे हद्दीतील आसले येथील उसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधार कार्ड व इतर कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित मृतदेह संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाली. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खूनच असावा, असा प्राथमिक अंदाज बांधून सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तपासाला सुरुवात केली. भुइंज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते.

दरम्यान, कारी येथे बुधवार, दि.४ रोजी सकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाइकांनी भुइंज पोलीस ठाण्यात येऊन संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे यानेच केला असल्याची फिर्याद दिली. यावरून भुइंज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले; परंतु तो सापडत नव्हता. मोबाइल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथके रवाना केली. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे यांच्या पथकाने वैराटगड पायथ्याशी असलेल्या डोंगरदऱ्यात रात्रंदिवस फिरून नितीन गोळेचा शोध घेतला. मात्र, अपयश आले होते. पोलिसांना गुंगारा देऊन नितीन गोळे बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना मिळाली. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून मंगळवार, दि.१० रोजी सायंकाळी पाच वाजता अटक केली.

त्याला भुइंज पोलीस ठाण्यात आणून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता दोन महिलांचा खून केल्याची कबुली दिली. संध्या शिंदे यांच्याबरोबरच पत्नी मनीषा नितीन गोळे यांचा १ मे २०१९ रोजी खून करून त्यांचाही मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याशी पुरल्याची कबुली भुइंज पोलिसांना दिली आहे, अशी माहिती भुइंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नितीन गोळे याला गुरुवारी वाईच्या न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

स्वत:च दिली पत्नी हरविल्याची नोंद

नितीन गोळे याने पत्नी मनीषा हिचा १ मे २०१९ रोजी खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून स्वतःच पत्नी हरविली असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. तिचा मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याला पुरून टाकल्याची, तसेच संध्या शिंदे हिचा गळा आवळून खून केल्याचीही कबुली नितीनने भुइंज पोलिसांना दिली. त्यानंतर नितीनने पुरलेला मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी खोदकाम सुरू केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर