शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आसाममध्ये हिंसाचार भडकला; 7 ट्रक पेटवले, 5 चालकांचा जळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:39 IST

Assam News : पोलिसांना डीएनएलए या अतिरेकी संघटनेवर संशय.

गुवाहाटी: संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंगब्राजवळ सात ट्रक जाळल्या. या घटनेत पाच ट्रक चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी अतिरेक्यांनी अनेग गोळ्याही झाडल्या. सूचना मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रकमधून पाच मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किमी अंतरावर ही घटना घडली.

आसाम पोलिसांनी सांगितल की, या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA) या अतिरेकी गटाचा हात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आसाम रायफल्सची मदत घेतली जात आहे.

आसाम आणि मिझोरामच्या सीमा वादामुळे हिंसाचार

काही दिवसांपूर्वी आसाम आणि मिझोरममधील सीमा वादात 5 पोलिसांसह 6 जण ठार झाले होते. दोन्ही राज्यांतील पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पण, जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. दरम्यान, गोळीबारही झाला. हिंसाचारानंतर आसाम आणि मिझोराम सीमेवर सीआरपीएफला तैनात करण्यात आलं होतं.

मे महिन्यात 7 डीएनएलएचे अतिरेकी ठार

यापूर्वी मे महिन्यात आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात डीएनएलए अतिरेकी ठार झाले होते. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरा 7 बदमाश ठार झाले. यासह, त्याचे दोन साथीदार चकमकीत गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि 4 एके 47 जप्त करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी