शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आसाममध्ये हिंसाचार भडकला; 7 ट्रक पेटवले, 5 चालकांचा जळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:39 IST

Assam News : पोलिसांना डीएनएलए या अतिरेकी संघटनेवर संशय.

गुवाहाटी: संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंगब्राजवळ सात ट्रक जाळल्या. या घटनेत पाच ट्रक चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी अतिरेक्यांनी अनेग गोळ्याही झाडल्या. सूचना मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रकमधून पाच मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किमी अंतरावर ही घटना घडली.

आसाम पोलिसांनी सांगितल की, या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA) या अतिरेकी गटाचा हात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आसाम रायफल्सची मदत घेतली जात आहे.

आसाम आणि मिझोरामच्या सीमा वादामुळे हिंसाचार

काही दिवसांपूर्वी आसाम आणि मिझोरममधील सीमा वादात 5 पोलिसांसह 6 जण ठार झाले होते. दोन्ही राज्यांतील पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पण, जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. दरम्यान, गोळीबारही झाला. हिंसाचारानंतर आसाम आणि मिझोराम सीमेवर सीआरपीएफला तैनात करण्यात आलं होतं.

मे महिन्यात 7 डीएनएलएचे अतिरेकी ठार

यापूर्वी मे महिन्यात आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात डीएनएलए अतिरेकी ठार झाले होते. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरा 7 बदमाश ठार झाले. यासह, त्याचे दोन साथीदार चकमकीत गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि 4 एके 47 जप्त करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी