शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:40 IST

विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता.

अंबरनाथ: अंबरनाथ बी केबिन रोड परिसरात भरदिवसा विजय नवलगिरे या तरुणाची हत्या गुरुवारी त्याच्या पत्नीसमोरच करण्यात आली. नेमका हा प्रकार का घडला? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यातच पोलिसांच्या तपासात एक बाब समोर आली आहे की हत्येच्या एक दिवस आधी विजयने आरोपीसोबत भांडण करून त्याला मारहाण केल्यामुळे वाद वाढला होता. याच वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. विजय आणि याच परिसरात राहणाऱ्या आरोपींचे पूर्वीपासून वाद असल्याने त्यांच्या मनात या प्रेमविवाहामुळे आणखी संताप वाढला होता. त्यातच गेल्या वर्षी रामू कोली याचे ताडीचे दुकान विजयने बंद पाडले होते. त्याचादेखील राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सुरू असतानाच १२ मे रोजी विजय आणि आरोपी जगदीश उर्फ जग्गू मुंगर यांच्यात वादावादी होऊन मारहाण झाली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी थेट विजय याचे घर गाठले. घराचे दार बंद असताना त्यांनी लाथा मारून दरवाजा तोडला. घरात जाताच विजयच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्याला ओढत इमारतीखाली आणले. यादरम्यान विजयची पत्नी वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी मिळेल त्या वस्तूने विजयवर हल्ला केला. एवढेच नव्हेतर, त्याला फरफटत नेत त्याच्या डोक्यावर दगड टाकला.आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी हे सर्व आरोपी एकत्रित आले होते. आरोपी कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली, राजू निंदी, आनंद, चिंटू, जयेश आणि एका अनोळखी इसमाने ही हत्या केली. ही हत्या करताना आरोपीने पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या ठोकळ्याचा वापर केला. एका आरोपीने स्वतःच्या ताब्यातील कटरच्या साह्याने विजयच्या मानेवर वार केले होते. 

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीया प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली आणि जयेश यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसambernathअंबरनाथthaneठाणे