शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:06 IST

Sameer Wankhede : कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन खबऱ्याला बनवले पंच 

ठळक मुद्देहे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे.

नवी मुंबई : एनसीबीने खारघर येथे नायझेरियन विरोधात केलेली कारवाई बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

आर्यन खान प्रकरणानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. त्यांच्या टिमने खारघर येथे केलेल्या कारवाईत पंच म्हणून असलेल्या खबऱ्याने ती कारवाई बनावट असल्याचे म्हंटले आहे. समीर वानखेडे यांच्यासाठी खबऱ्याचे काम करणाऱ्या शेखर कांबळे यांनी त्याठिकाणी एक नायझेरियन व्यक्ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र कारवाईवेळी सदर नायझेरियन व्यक्तीने तिथून पळ काढला होता. यानंतर हे पथक एका ठिकाणी गेले असता, त्याठिकाणावरून दोन नायझेरियन व्यक्तींना पकडून एनसीबी कार्यालयात नेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कांबळे यांना कार्यालयात बोलावून पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. यावेळी आपण कोऱ्या कागदावर सह्या घेत असल्याबाबत आक्षेप घेतला असता, काही होणार नाही याची हमी देण्यात आली होती. मात्र नुकतेच या कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर पंच म्हणून आपला नोंदवलेला जबाब खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही ड्रग्स शिवाय पकडलेल्या व्यक्तीकडे ६० ग्रॅम एमडी सापडल्याचा जबाब सही घेतलेल्या कोऱ्या कागदावर नोंदवण्यात आल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.

हे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने मंगळवारी रात्री एनसीबी कार्यालयातून अनिल माने यांनी फोन करून आपल्याला भेटीसाठी बोलावल्याचेही सांगितले. मात्र कारवाईचा बनाव उघड झाल्याने आपल्या जीविताला भीती असल्याने एनसीबी कार्यालयात जायचे टाळले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोपर खैरणे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला आहे. त्यामध्ये स्वतःला व कुटुंबाला पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

दहा ते बारा कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.

खारघरच्या कारवाईच्या निमित्ताने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलवून घेतल्यानंतर त्याठिकाणी आपल्याकडून दहा ते बारा कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्यासाठी समीर वानखेडे व अनिल माने यांनी भाग पाडल्याचाही आरोप केला आहे. त्यापैकी एका कागदाचा वापर खारघच्या कारवाईसाठी झाला असून, इतर कागद देखील काही कारवाईसाठी पंच म्हणून वापरले गेले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSameer Wankhedeसमीर वानखेडेPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ