शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

धक्कादायक! मटार महाग विकल्याच्या रागात भाजी विक्रेत्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:58 IST

१० रुपयांवरून वाद, मानखुर्दमधील घटना, मामा-भाच्याला अटक

ठळक मुद्दे या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अभिषेक धुमाळ (२२) आणि साहिल खराडे (१९) या दोघांना अटक केली आहे.मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सायन-पनवेल हायवे ब्रिजखाली रामखिलान यादव (३०) हे भाजी विक्री करीत होते.

मुंबई - अवकाळी पाऊस, त्यात पिकांच्या झालेल्या नासाडीमुळे भाज्यांचे भाव कडाडले. यातच, मटार जास्त भावाने विकत असल्याच्या रागात ग्राहकाने भाजी विक्रेत्याची हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये सोमवारी घडली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अभिषेक धुमाळ (२२) आणि साहिल खराडे (१९) या दोघांना अटक केली आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सायन-पनवेल हायवे ब्रिजखाली रामखिलान यादव (३०) हे भाजी विक्री करीत होते. त्यांनी मटारचे १० रुपयांचे छोटे-छोटे वाटे करून विक्रीसाठी ठेवले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास धुमाळ आणि खराडे तेथे आले. त्यांनी, मटारचा वाटा घेत त्यात आणखी मटार टाकण्यास सांगितले. मात्र भाजी महाग असल्याचे सांगत यादवने नकार दिला. जास्त भावाने मटार विकत असल्याच्या रागात दोघांनी त्याच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनी यादवला बेदम मारहाण केली. एकाने पट्ट्याने मारहाण केली. या मारहाणीत यादव गंभीर जखमी होत बेशुद्ध झाले. त्यांना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यादव यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार, पोलिसांनी तपासाअंती धुमाळ व खराडे दोघांनाही अटक केली. दोघेही आंबेडकरनगर येथील रहिवासी असून मामा-भाचे आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटकvegetableभाज्या