शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बेराेजगार पित्याने मुलाचाच घेतला जीव! नाेकरी गेली, भीकही मागितली; अखेर उचलले पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:45 IST

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

सांचौर (जालौर) :

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मुकेश असे क्रूर पित्याचे नाव असून, तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नलोधर गावचा रहिवासी आहे. 

आरोपीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कामधंदा नसल्याने घर चालविणे कठीण झाल्याने त्याने पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट आखला. मुलाला आजी-आजोबांकडे सोडण्याचा बहाणा करून तो पत्नी, मुलाला घेऊन गुजरातहून राजस्थानला आला. सिद्धेश्वर (सांचौर) गावात यात्रेकरूंसाठीच्या भंडाऱ्यात त्याने जेवण केले. पत्नीला खोटे सांगून तो मुलाला घेऊन गेला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलाला कालव्यात फेकले. सात महिन्यांपूर्वी माझी सुरक्षारक्षकाची नोकरी गेली. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मी भीकही मागितली, असे मुकेशने सांगितले.

२० किमीवर मिळाला चिमुरड्याचा मृतदेहपोलीस मित्र काना राम (वय ४३) यांनी पती-पत्नीला मुलासह पाहिले होते. मात्र, थोड्या वेळाने या जोडप्याकडे मूृल नव्हते. संशय आल्याने त्यांनी सांचौर पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिद्धेश्वरपासून २० कि.मी.वर तेतरोल येथे या मुलाचा मृतदेह आढळून आला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या