शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:32 IST

Kerala Crime News : मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती.

Kerala Crime News : केरळच्या त्रिरूवल्लामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे घरात धन आणि संपत्ती यावी म्हणून दोन महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीसहीत 3 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनुसार, आरोपींनी आधी महिलांचा गळा कापून हत्या केली आणि नंतर त्यांना दफन केलं.

मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. पोलीस जेव्हा दोघींच्या बेपत्ता असण्याच्या केसचा तपास करत होते तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांना समजलं की, महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी  त्रिरूवल्ला येथे राहणारा भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीला व एक इतर आरोपी शिहाब याला अटक केली आहे. तिघांची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनुसार, महिलांना एरनाकुलम येथून  तस्करी करून आणण्यात आलं होतं. दोघींचीही हत्या त्रिरूवल्लामध्येच करण्यात आली. शिहाबवर कथितपणे महिलांना फूस लावून त्रिरूवल्लात आणल्याचा आरोप आहे. भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीलावर दोन महिलांचा बळी देण्याचा आरोप आहे. 

पोलीस कमिश्नर सी एच नागाराजू यांनी सांगितलं की, मानवी बळी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. आम्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. महिलांचं शीर कापून त्यांची हत्या करण्यात आली.  त्यांचे मृतदेह पठानमथिट्टाच्या एलंथूरमध्ये दफन करण्यात आले. ते म्हणाले की, याप्रकरणी आणखीही काही लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

कमिश्नर म्हणाले की, महिलांचा बळी देण्याचा मुख्य उद्देश धन, संपत्ती मिळवणे हा होता. त्यांनी सांगितलं की, कपल आणि एजंटने आपले गुन्हे कबूल केले आहेत. पोलिसांनुसार, कपल आर्थिक संकटाचा सामना करत होतं. त्यांनी देवाला खूश करण्यासाठी या संकटातून बाहेर पडण्यासाठी महिलांचा बळी देण्याचं ठरवलं होतं.  

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी