शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:32 IST

Kerala Crime News : मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती.

Kerala Crime News : केरळच्या त्रिरूवल्लामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे घरात धन आणि संपत्ती यावी म्हणून दोन महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीसहीत 3 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनुसार, आरोपींनी आधी महिलांचा गळा कापून हत्या केली आणि नंतर त्यांना दफन केलं.

मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. पोलीस जेव्हा दोघींच्या बेपत्ता असण्याच्या केसचा तपास करत होते तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांना समजलं की, महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी  त्रिरूवल्ला येथे राहणारा भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीला व एक इतर आरोपी शिहाब याला अटक केली आहे. तिघांची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनुसार, महिलांना एरनाकुलम येथून  तस्करी करून आणण्यात आलं होतं. दोघींचीही हत्या त्रिरूवल्लामध्येच करण्यात आली. शिहाबवर कथितपणे महिलांना फूस लावून त्रिरूवल्लात आणल्याचा आरोप आहे. भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीलावर दोन महिलांचा बळी देण्याचा आरोप आहे. 

पोलीस कमिश्नर सी एच नागाराजू यांनी सांगितलं की, मानवी बळी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. आम्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. महिलांचं शीर कापून त्यांची हत्या करण्यात आली.  त्यांचे मृतदेह पठानमथिट्टाच्या एलंथूरमध्ये दफन करण्यात आले. ते म्हणाले की, याप्रकरणी आणखीही काही लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

कमिश्नर म्हणाले की, महिलांचा बळी देण्याचा मुख्य उद्देश धन, संपत्ती मिळवणे हा होता. त्यांनी सांगितलं की, कपल आणि एजंटने आपले गुन्हे कबूल केले आहेत. पोलिसांनुसार, कपल आर्थिक संकटाचा सामना करत होतं. त्यांनी देवाला खूश करण्यासाठी या संकटातून बाहेर पडण्यासाठी महिलांचा बळी देण्याचं ठरवलं होतं.  

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी