शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

122 करोड घोटाळ्यातील दोन कंत्राटदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:24 IST

विरार पोलिसांना सोयरसुतक नाही पण वसई न्यायालय मात्र गंभीर 

ठळक मुद्देतपास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद ?. उर्वरित 23 कंत्राटदारांना पोलीस कधी अटक करणार, पीडित कामगारांना खरोखरच न्याय देणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

 

नालासोपारा - 122 करोडचा घोटाळा केला म्हणून 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात 2 मार्च 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण 76 दिवस गुन्हा दाखल झाल्यावरही तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे कोणती कारवाई करत आहेत की आर्थिक व्यवहार करून घोटाळेबाज कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का आरोप कामगारांनी केला आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून 25 पैकी आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण या कंत्राटदाराला 22 एप्रिलला अटक केले व नंतर दोन दिवसात बालाजी सर्विसचे मंगरूळे बी. दिगंबरराव यांना अटक केले पण याची कुठेही वाच्यता किंवा याबाबत कोणालाही न सांगितल्याने तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांची तपासाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. उर्वरित 23 कंत्राटदारांना पोलीस कधी अटक करणार, पीडित कामगारांना खरोखरच न्याय देणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या संपुर्ण प्रकरणावर वसई न्यायालय गंभीर असून कोणत्याही कंत्राटदाराला व अटक असलेल्या दोघांना जामीन देत नसून विरार पोलिसांना मात्र काहीही सोयरसुतक नसल्याचे वाटते.मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने 122 करोड रुपयांचा घोटाळा विरार पोलिसांनी दाखल केला पण कारवाई होत नसल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होती. राजकीय वरदहस्त असलेले मातब्बर त्या 23 कंत्राटदारांना नक्की पोलीस अटक करणार का हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून विरार पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वसई विरार मनपा सोबत पत्रव्यवहार सुरू असून पुरावे गोळा करत असल्याचे कारण देत टाळाटाळ सुरू ठेवली आहे. सेवा कर, व्यवसाय कर, कामगार राज्य विमा योजना, कामगार आयुक्तालय यांच्याशी गुन्ह्या संदर्भात पत्रव्यवहार करणे गरजेचे होते ते केले आहे की नाही ? असे अनेक सवाल करून विरार पोलीस नेमके ह्या प्रकरणात काय करत आहे हा प्रश्न कामगारांना पडला आहे.नेमके काय होते प्रकरणवसई विरार मनपाच्या 3165 ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण 122 करोड च्या घोटाळ्यात 29 करोड 50 लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून 92 करोड 50 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाऱ्यांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.फरार असलेले 23 घोटाळेबाज ठेकेदारदिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्विस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई  इंटरप्राइजेस (विनोद पाटिल), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्ट्रिकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरुखकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस