शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

देशद्रोह प्रकरण: कंगना रनाैत भगिनींना १५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 03:37 IST

न्यायालयाने ही सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करताना म्हटले की, या दोघींच्या अंतरिम संरक्षणात वाढ करण्यात येत आहे

मुंबई : देशद्रोहप्रकरणी कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांना अटकेपासून १५ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयाने संरक्षण दिले.वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने रनाैत भगिनींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर दाेघींनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.

न्यायालयाने ही सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करताना म्हटले की, या दोघींच्या अंतरिम संरक्षणात वाढ करण्यात येत आहे.कंगनाने केलेल्या ट्विटवरून ऑक्टोबरमध्ये तिच्याविरुद्ध वांद्रे न्यायालयात खासगी तक्रार केली. कंगना ट्विटरद्वारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा दावा तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.दरम्यान, तक्रारदार मुनाव्वर अली सय्यद यांच्यातर्फे ॲड. रिझवान मर्चंट यांनी उच्च न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कंगना व तिच्या बहिणीने ट्विटद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  वारंवार त्यांनी हेच केले. त्यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी दिलेले निर्देश योग्य आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, कंगनाविरोधात केलेल्या अवमान याचिकेवरही उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतCourtन्यायालय