शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 23:46 IST

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही.

अलवर - राजस्थानच्या अलवरमध्ये माजी सरपंचाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा २० दिवसांनी पोलिसांनी समोर आणला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार होणारं शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने दुपट्ट्याने आणि तारेने गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येवेळी मृत युवक नशेत असल्याचंही तपासात उघड झाले आहे. 

अतिरिक्त एसपी अतुल साहू यांनी सांगितले की, १७ मे रोजी कोटकसिम भागातील खानपूर गावात माजी सरपंच धनीराम यादव यांचा मुलगा विक्रम उर्फ ​​लाला याची हत्या करण्यात आली होती. खून केल्यानंतर मृतदेह गावाजवळील शेतात रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सुरुवातीला हत्येचा उलगडा लवकरच होईल, असे वाटत होते, मात्र घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले. पोलिसांनी कसून तपास केला असता खुनाचे रहस्य उलगडले. विक्रमच्या हत्येच्या आरोपावरून गावातील अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. तिचे एका मुलासोबत संबंध असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. एके दिवशी दोन मुलांनी तिला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी विक्रमलाही कळले आणि याच गोष्टीचा फायदा घेत त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही. दरम्यान, विक्रम तिला सतत त्रास देत होता. अशा स्थितीत अल्पवयीन मुलीने विक्रमला मारण्याचा कट रचला. १७ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलाने विक्रमला आपल्या घरी बोलावले. त्याने दारूच्या नशेत घर गाठले. घरातून अल्पवयीन मुलीने त्याला जवळच्या शेतात नेले आणि दुपट्ट्याने त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घरी आल्यानंतर ती झोपी गेली. सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिस अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी सांगितले की, वारंवार शारीरिक अत्याचारामुळे त्रासून अल्पवयीन मुलीने विक्रमचा गळा दाबून खून केला. विक्रम मुलीवर शारीरिक अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. १७ मेच्या रात्रीही तो दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या वाईट हेतूने गेला. अखेर नाराज होऊन अल्पवयीन मुलीने त्याचा जीव घेतला. यासोबतच घटनास्थळावरून पुरावेही मिटवण्यात आले. मात्र, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीची नारी निकेतन येथे रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डझनभर लोकांची चौकशी केली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थान