शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून तीन कामगार ठार; नऊ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 20:44 IST

अतिरिक्त एमआयडीसीत ओमसाईराम ही स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे.

जालना : येथील औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान तप्त लोहरस अंगावर पडून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा भाजल्याने मृत्यू झाला. तर अन्य नऊ कामगार जखमी झाल्याचे पोलीसांनी सांगितले. जे तीन कामगार मयत झाले आहेत, ते पूर्णपणे भाजल्याने त्यांची नावे सायंकाळपर्यंत कळू शकली नाहीत.

येथील अतिरिक्त एमआयडीसीत ओमसाईराम ही स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान भट्टीतील तप्त लोहरस एका बकेटमधून क्रेनव्दारे वाहून नेण्याची प्रक्रिया  सुरू होती. त्यात तांत्रिक बिघाड होऊन त्यातील तप्त लोहरस कंपनीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्याने तीन जणांचा भाजून मृत्यू झाला. तर अन्य नऊ जण जखमी झाले असून, त्यांना प्रथम जालन्यातील एका खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर लगेचच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी  घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अन्य नऊ जण  जखमी झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघात