शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रत्नागिरीत तिघांवर तलवारींनी हल्ला, दोनजण ताब्यात, अन्य फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 15:11 IST

रत्नागिरी - पूर्ववैमनस्यातून चारजणांवर तलवारींनी हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला ...

रत्नागिरी - पूर्ववैमनस्यातून चारजणांवर तलवारींनी हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर हाताचा अंगठा तुटलेल्या उबेदउल्ला होडेकर याला कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.

शहराच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीनजीक शुक्रवारी रात्री १0 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. उबेदउल्ला निजामुद्दिन होडेकर (वय ३६), मुदस्सर मेहबुब काझी (वय३५) आणि अझहर इकबाल सावंत (वय३२) या तिघांवर एका जमावाने हल्ला केला. या तिघांचा काही लोकांशी पूर्वी वाद झाला होता. त्यातून मारामारीचाही प्रकार घडला होता. त्या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रत्नागिरीतील अल्ताफ जाफर संगमेश्वरी, विजय माने, अन्या वालम, हर्षल शिंदे, बाबा नाचणकर, मुन्ना देसाई, अभिजित दुडे यांच्यासह अन्य चार-पाचजणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व संशयितांनी उबेदउल्ला आणि त्याच्या दोन मित्रांवर तलवारी व अन्य धारदार हत्यारांनी वार केले. या सर्वांना पिस्तुलाचा धाकही दाखवण्यात आला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. यातील मुदस्सर आणि अझहर त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, उबेद याला कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.

राजकीय वाद नाही

या प्रकारातील जखमी उबेदउल्ला होडेकर हा स्वाभिमान संघटनेच्या अल्पसंख्याक आघाडीचा रत्नागिरी तालुकाध्यक्ष आहे. संशयित आरोपींमधील अल्ताफ संगमेश्वरी हे राजापूर अर्बन बँकेचे संचालक असून, शिरगाव ग्रामपंचायतीच उपसरपंच आहेत. अर्थात हा हल्ला कुठल्याही राजकीय कारणातून झाला नसून, आधी झालेल्या वादातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुन्ना देसाई आणि बावा नाचणकर अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी