शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

खवल्या मांजराची खवलं विक्रीसाठी आलेल्या तिघांना भाईंदरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 21:44 IST

साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

मीरारोड - वन्यजीवातील संरिक्षत आणि अतिदुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर यांना रामदेव पार्क येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे मंडई जवळ खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने थाटकर यांच्यासह रविंद्र भलेराव, नवनाथ माने, नीलेश शिंदे, नितेश पाटील, चेतन राजपूत व आकाश वाकडे यांच्या पथकाने सापळा रचला होता.सायंकाळी सहाच्या सुमारास एका गाडीने तिघे जण आले असता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेपाच किलो खवलं सापडली असून त्याची बाजारात सुमारे २२ लाख इतकी किंमत आहे. या प्रकरणी सतीश बिहरे (५१),सचिन ढोले (३८) व नीलेश उधे (३८) या तिघांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे . तिघेही रत्नागिरीचे राहणारे आहेत. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीbhayandarभाइंदर