शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 12:25 IST

Crime News Aurangabad: पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

कायगाव, औरंगाबाद : १४ महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील २९ वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंमळनेर येथील तरुण गणेश दामोदर मिसाळ हा ५ ऑक्टोबर २०१९ पासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी ५ दिवस सर्वत्र शोध घेऊनही गणेश सापडला नसल्याने, १० ऑक्टोबर २०१९ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 

तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान,  पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित, आणि रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासात सचिन ज्ञानेश्वर पंडित याचे गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि  मयत गणेश याला अनैतिक संबंधाची माहिती होती, तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. या कारणावरून आरोपींनी  कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला आणि प्रेत अंमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या  शेतात पुरून टाकले होते, अशी माहिती समोर आली. 

पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर,  विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ आदींचा या संपूर्ण कारवाईत समावेश होता. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी तंत्रशुद्ध व कौशल्यपूर्ण तपास केल्याने आणि प्रकर्मचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.