शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 10:17 IST

Pune Accident: एकूण नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय व देहुरोड एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

किवळे : मुंबई -बेंगळुरू महामार्गावर लातूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी खाजगी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किवळे-रावेत  गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील एकूण ४९ प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा जागीच  मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा तिसरा भीषण अपघात आहे. 

एकूण  नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील  शासकीय रुग्णालय व  देहुरोड एका खाजगी रुग्णालयात  उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे . अपघातानंतर महामार्ग पोलीस व रावेत पोलीस चौकीचे पोलीस. घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आली आहेत. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.

पहिला अपघात

मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्‍या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर नर्‍हे येथील सेल्फी पॉइंट जवळ एका  मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने सातारा कडून मुंबईच्या दिशेने जात होती. 

अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

१०० मीटर अंतरावर दुसरा अपघात दरम्यान या अपघात ठिकाणांपासून १०० मीटर अंतरावर पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रक एकमेकांना धडकून पलटी झाले आहेत. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे