शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 10:17 IST

Pune Accident: एकूण नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय व देहुरोड एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

किवळे : मुंबई -बेंगळुरू महामार्गावर लातूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी खाजगी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किवळे-रावेत  गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील एकूण ४९ प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा जागीच  मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा तिसरा भीषण अपघात आहे. 

एकूण  नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील  शासकीय रुग्णालय व  देहुरोड एका खाजगी रुग्णालयात  उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे . अपघातानंतर महामार्ग पोलीस व रावेत पोलीस चौकीचे पोलीस. घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आली आहेत. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.

पहिला अपघात

मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्‍या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर नर्‍हे येथील सेल्फी पॉइंट जवळ एका  मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने सातारा कडून मुंबईच्या दिशेने जात होती. 

अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

१०० मीटर अंतरावर दुसरा अपघात दरम्यान या अपघात ठिकाणांपासून १०० मीटर अंतरावर पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रक एकमेकांना धडकून पलटी झाले आहेत. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे