शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 10:17 IST

Pune Accident: एकूण नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय व देहुरोड एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

किवळे : मुंबई -बेंगळुरू महामार्गावर लातूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी खाजगी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किवळे-रावेत  गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील एकूण ४९ प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा जागीच  मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा तिसरा भीषण अपघात आहे. 

एकूण  नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील  शासकीय रुग्णालय व  देहुरोड एका खाजगी रुग्णालयात  उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे . अपघातानंतर महामार्ग पोलीस व रावेत पोलीस चौकीचे पोलीस. घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आली आहेत. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.

पहिला अपघात

मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्‍या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर नर्‍हे येथील सेल्फी पॉइंट जवळ एका  मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने सातारा कडून मुंबईच्या दिशेने जात होती. 

अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

१०० मीटर अंतरावर दुसरा अपघात दरम्यान या अपघात ठिकाणांपासून १०० मीटर अंतरावर पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रक एकमेकांना धडकून पलटी झाले आहेत. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे