शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चोर समजून तिघांना बांधून मारहाण;  नगरसेविकेच्या पतीसह तिघांना अटक,पोलिसांनाही धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 13:50 IST

पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने, साेमवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पातान बंदर येथे तीन तरुणांना चोर समजून बांधून मारहाण केली. गणेश भोईर (१९), हरचंद भोईर (२०) व अंकुश भासर (२१, सर्व रा.उत्तन) अशी तरुणांची नावे आहेत. 

पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १८ ते २३ जणांवर गुन्हा दाखल करून शिवसेना नगरसेविकेचा पती अजित गंडाेली, सायमन बगाजी व सचिन नून या तिघांना अटक केली आहे.  पोलीस नाईक चेतन पाटील यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यानुसार, सोमवारी रात्री १०.४५ वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या फाेनवरून भुतोडी-पातान बंदरदरम्यान चोर समजून मंडपाचे काम करणाऱ्या तिघांना जमावाकडून मारहाण सुरू असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर, उपनिरीक्षक किरण धनवडे आपल्या दाेन सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. दाेरीने बांधून ठेवलेल्या तिघांना मारहाण करत होते. जमावाला आवाहन करून जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे धनवडे यांनी अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर धनवडे यांनी शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांचे पती अजित यांच्यासह सायमन बगाजी व सचिन नून यांना कायदा हातात न घेता तरुणांना ताब्यात द्या, अशी विनंती केली. त्यांनी ते ऐकले नाही. 

पाेलिसांना गराडा

जमावाने विराेध करून पोलीस व वाहनाभोवती गराडा घातला. त्यांना गाडीत बसविल्यानंतर पोलिसांनी जमावावर बळाचा वापर करताच, लोकांनी पाेलिसांना पुन्हा धक्काबुक्की केली आणि तिघांना बाहेर काढून पुन्हा मारहाण केली. पोलिसांच्या गाडीवर लाथा मारल्या. जादा कुमक येताच पाेलिसांनी तिघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणेPoliceपोलिस