शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रेल्वेत चोऱ्या; तिघांना बेड्या, नागपूर परिसरात सात चोरीच्या घटना उघडकीस

By नरेश डोंगरे | Updated: February 25, 2024 20:03 IST

बेसावध प्रवाशांना बसायचा फटका, करण्यात आले रेल्वे पोलिसांच्या हवाली

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे गाडी आणि स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) जेरबंद केले. चाैकशीनंतर त्यांच्याकडून सात चोरीच्या घटनांचा उलगडा झाला. त्यांना रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील आलेसूर येथील रहिवासी असलेला आरोपी पुरुषोत्तम गजानन बावणे (वय ३६) हा संधी साधून रेल्वे प्रवाशांचे सामान चोरतो. १६ फेब्रुवारीला त्याने अशाच प्रकारे येथील रेल्वे स्थानकावरून एका वृद्ध प्रवाशाचा मोबाइल चोरला होता. त्याची रेल्वे पोलिसांकडे तक्रारही दाखल आहे. २२ फेब्रुवारीला तो रेल्वे स्थानकावर येऊन पुन्हा सावज शोधू लागला. त्याच्या वर्तनावरून संशय आल्यामुळे आरपीएफचे संतोष झरणे, नीरज कुमार आणि अमित कुमार यांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली.

दुसऱ्या चोरट्याचे नाव रूपेश नंदकिशोर पांडे (वय ३०) असून, तो नागपुरातील शांतीनगरात राहतो. हा भामटा सराईत चोर असून त्याने अवघ्या दोन आठवड्यांत रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेच्या पर्ससह तीन चोऱ्या केल्या. आरपीएफचे बी. डी. अहिरवार, देवेंद्र पाटील, लुनाराम टांक आणि राकेश पाल यांनी पांडेच्या मुसक्या बांधल्या.

तिसरा आरोपी गोंदिया जिल्ह्यातील सरकारटोला, मुंडीपार येथे राहतो. दिलीप काभलकर (वय ३२), असे त्याचे नाव असून, आरपीएफचे नीरज कुमार आणि रवींद्र कुमार या जवानाने त्याला ताब्यात घेतले. त्याने चाैकशीदरम्यान यापूर्वीच्या अनेक मोबाइल चोरीची कबुली दिली. या तिघांनाही रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

बेसावध प्रवाशांना फटका

गेल्या काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या या गुन्ह्यात सर्वाधिक घटना मोबाइल चोरीच्या आहेत. प्रवासी बेसावध होताच चोरटे त्याचा मोबाइल किंवा पर्स लंपास करतात. रेल्वे पोलिस आणि आरपीएफ या घटनांना आळा घालण्यासाठी कामी लागले आहेत. प्रवाशांनी आपले किमती सामान व्यवस्थित ठेवावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी