शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इतवारीत चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकाने फोडली , व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:40 IST

मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.इतवारीच्या तीन नळ चौकात कसार ओळीत जरीपटका येथील रहिवासी राजकुमार मुलचंदानी यांची भागचंद तोलाराम फर्म आहे. मुलचंदानी जोडे-चपलांचे होलसेल व्यापारी आहेत. चोरट्यांनी आधी मुलचंदानी यांचे दुकान फोडले. सब्बलच्या साह्याने शटर तोडले. दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले लाखो रुपये पळविले. मुलचंदानी यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर शेखर जैन यांचे लक्ष्मी मेगा मार्ट दुकान आहे. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटे दुकानात घुसले. दुकानाच्या काऊंटरमध्ये २५० रुपये ठेवले होते. आरोपींनी हे पैसे घेऊन पळ काढला. रात्री २.३० वाजता मुलचंदानी यांना चौकीदाराने सूचना दिली. ते त्वरित दुकानात पोहोचले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी परिसरातील इतर दुकानातही चोरी केल्याचा संशय आल्यामुळे मुलचंदानी यांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना लक्ष्मी मेगा मार्टचे कुलूपही तुटलेले दिसले. त्यानंतर शेखर जैन आणि मुलचंदानी यांनी तहसील पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश आहे. ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांनी आरामात चोरी केली. घटनेच्या वेळी या परिसरात कुणाचेही येणे-जाणे नसते, हे चोरट्यांना माहीत होते. परिसरात यापुर्वीही व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी झाली आहे. हवालाची रक्कम असल्याचा संशय आल्यामुळे एका दुकानात चोरी झाली होती. इतवारी हा व्यापारी आणि रहिवासी परिसर आहे. येथे चोरी करणे सोपे नाही. तहसील पोलिसांची परिसरात गस्त असते. व्यापाऱ्यांनी आपले सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत. तरीसुद्धा चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी दुपारी गांधीबागमध्ये रिक्षासह ८६ हजाराच्या गारमेंटचे पार्सल चोरी केले होते. या घटनेचा खुलासा होण्यापूर्वीच दोन दुकानात चोरी झाली. तहसिल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. शेखर जैन यांनी केवळ २५० रुपये गेल्यामुळे तक्रार दाखल केली नाही तर मूलचंदानी यांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.

टॅग्स :theftचोरीMarketबाजारnagpurनागपूर