शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:51 IST

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

मुंबई – जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरनजीक झालेल्या हत्याकांडात नवा खुलासा समोर आला आहे. वादावादीत एका आरपीएफ जवानाने अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपी जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. तर ४ मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह देशात खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची पोस्टींग आरपीएफ गुजरातला झाली होती. फायरिंग करणारा आरोपी जवान हादेखील गुजरातमध्येच पोस्टिंगला होता. या दोघांना एस्कॉर्ट ड्युटीला तैनात केले होते. आरोपी चेतनने सर्व्हिस बंदुकीने त्यांच्यावर हल्ला केला. जयपूर-मुंबई एक्सप्रेसच्या बी ५ या कोचमध्ये ही फायरिंग झाली. ही घटना सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फायरिंगमध्ये ४ लोकांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. आरपीएफ जवान आणि त्याचे सिनिअर अधिकारी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला होता. ज्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबलने गोळीबार सुरू केला. पालघर ते बोरिवली स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर ट्रेनची साखळी ओढून आरोपी चेतनने दहिसरनजीक ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मुंबईच्या बोरिवली पोलिसांच्या पथकाने कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनुसार, आरोपी जवानाने त्याच्या मित्राला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आता मी नोकरीला थकलो आहे. VRS घेऊन निवृत्त होण्याचा त्याचा मानस होता. काही वर्षांपूर्वी सूरत RPF मध्ये पोस्टिंगवेळी ट्रेनमध्ये काही टोळक्यांनी टिकाराम यांना चाकू मारला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यातून ते बचावले.

टिकाराम हा प्रामाणिक माणूस होता. ट्रेनमध्ये एस्कॉर्टमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला तो झोपू देत नव्हता. आणि ड्युटीवर सतर्क राहण्यास सांगत असे. रात्रीच्या ड्युटीवर झोपलेल्या कॉन्स्टेबल चेतनला त्याने रोखले असावे, असा संशय आहे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. वैयक्तिक वैरही नाकारता येत नाही. मात्र चेतनने इतर प्रवाशांना गोळ्या का मारल्या? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याला ट्रेनमध्ये पकडले जाण्याची भीती होती का? या प्रश्नाचा शोध घेत आहे.  मृत आरपीएफ एएसआय टिकाराम मीणा यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याची पत्नी काही कामासाठी गावाबाहेर गेली आहे. त्यांना या घटनेची माहितीही नव्हती. मुलगा आणि सून गोव्याला गेले आहेत. त्याचा फोन लागत नाही. तर आई खूप वृद्ध आहे, तिला नीट बघता-ऐकता येत नाही. मुलगी लग्नानंतर सासरी आहे.

 

 

टॅग्स :Firingगोळीबार