शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:51 IST

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

मुंबई – जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरनजीक झालेल्या हत्याकांडात नवा खुलासा समोर आला आहे. वादावादीत एका आरपीएफ जवानाने अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपी जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. तर ४ मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह देशात खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची पोस्टींग आरपीएफ गुजरातला झाली होती. फायरिंग करणारा आरोपी जवान हादेखील गुजरातमध्येच पोस्टिंगला होता. या दोघांना एस्कॉर्ट ड्युटीला तैनात केले होते. आरोपी चेतनने सर्व्हिस बंदुकीने त्यांच्यावर हल्ला केला. जयपूर-मुंबई एक्सप्रेसच्या बी ५ या कोचमध्ये ही फायरिंग झाली. ही घटना सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फायरिंगमध्ये ४ लोकांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. आरपीएफ जवान आणि त्याचे सिनिअर अधिकारी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला होता. ज्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबलने गोळीबार सुरू केला. पालघर ते बोरिवली स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर ट्रेनची साखळी ओढून आरोपी चेतनने दहिसरनजीक ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मुंबईच्या बोरिवली पोलिसांच्या पथकाने कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनुसार, आरोपी जवानाने त्याच्या मित्राला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आता मी नोकरीला थकलो आहे. VRS घेऊन निवृत्त होण्याचा त्याचा मानस होता. काही वर्षांपूर्वी सूरत RPF मध्ये पोस्टिंगवेळी ट्रेनमध्ये काही टोळक्यांनी टिकाराम यांना चाकू मारला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यातून ते बचावले.

टिकाराम हा प्रामाणिक माणूस होता. ट्रेनमध्ये एस्कॉर्टमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला तो झोपू देत नव्हता. आणि ड्युटीवर सतर्क राहण्यास सांगत असे. रात्रीच्या ड्युटीवर झोपलेल्या कॉन्स्टेबल चेतनला त्याने रोखले असावे, असा संशय आहे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. वैयक्तिक वैरही नाकारता येत नाही. मात्र चेतनने इतर प्रवाशांना गोळ्या का मारल्या? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याला ट्रेनमध्ये पकडले जाण्याची भीती होती का? या प्रश्नाचा शोध घेत आहे.  मृत आरपीएफ एएसआय टिकाराम मीणा यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याची पत्नी काही कामासाठी गावाबाहेर गेली आहे. त्यांना या घटनेची माहितीही नव्हती. मुलगा आणि सून गोव्याला गेले आहेत. त्याचा फोन लागत नाही. तर आई खूप वृद्ध आहे, तिला नीट बघता-ऐकता येत नाही. मुलगी लग्नानंतर सासरी आहे.

 

 

टॅग्स :Firingगोळीबार