शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

ज्याच्याशी लग्नासाठी घरच्यांशी भांडली, त्यानेच दीड महिन्यांत तिला संपविले, प्रेम कहाणीचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:28 IST

गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली.

दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची प्रियकराने हत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना मेरठमधून धक्कादायक बातमी हाती येत आहे. गुरुग्रामच्या दीपाने कुटुंबाचा विरोध पत्करून साजन उर्फ गौरवशी दीड महिन्यांपूर्वी लग्न केले होते. परंतू, या लव्ह मॅरेजचा अंत झाला आहे. 

गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली. जेव्हा पोलिसांना दीपाच्या आईने याची माहिती दिली, तेव्हा पोलिसांना दिपाच्या सासरचे लोक घराला टाळे ठोकून फरार झाल्याचे आढळले. तीन दिवसांपूर्वी दीपाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे गौरवच्या शेजाऱ्यांनी सांगितले. 

पोलीस ठाणे प्रभारी योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुडगावच्या अनिता यांनी कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली. दीड महिन्यापूर्वी त्यांची मुलगी दीपाचा शेरगढी येथील साजन उर्फ ​​गौरव याच्यासोबत कोर्ट मॅरेज झाले होते. दीपाच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. दीपा गौरवसोबत शेरगढी येथे राहू लागली होती. 26 मे रोजी दीपाची हत्या केल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केल्याची माहिती अनिताला कोणीतरी दिली. याबाबत माहिती मिळताच मेडिकल पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे कोणीही आढळून आले नाही. सासरचे लोक पळून गेले आहेत.

तीन दिवसांपूर्वी दीपाला सासरचे लोक आजारी असल्याचे सांगून घेऊन गेले होते, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजले, असे शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले. दीपाच्या नातेवाईकांना मेरठला बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच संपूर्ण घटना समजेल. दीपाचा पती साजन आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे, असे पोलीस म्हणाले. 

गुरुग्राममधील झाझर रोडवरील हॉस्पिटलमध्ये दीपा कामाला होती. इन्स्टाग्रामवर साजनशी ओळख झाली. साजन गुरुग्राममधील एका कंपनीत सुपरवायझर होता. यामुळे त्यांची वारंवार भेट होऊ लागली. तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांसोबत राहू लागले होते. सहा महिन्यांपूर्वी दीपाने तिच्या कुटुंबीयांना साजनबद्दल माहिती दिली होती. तेव्हा दीपाला विरोध करण्यात आला होता. यामुळे दीड महिन्यापूर्वी दीपाने घर सोडले आणि साजनसोबत कोर्टात लग्न केले. 

अनिता यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमविवाहानंतर आम्ही माघार घेतली होती. दीपाशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. रविवारपासून दीपाचा मोबाईल लागत नव्हता. यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला हे समजले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी