४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:04 PM2023-01-31T19:04:16+5:302023-01-31T19:04:34+5:30

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली

The mother of 4 children killed boyfriend at banda UP | ४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

googlenewsNext

बांदा - उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात प्रेम प्रकरणात एका महिलेने कथित प्रियकरासोबत मिळून दुसऱ्या प्रियकराची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी कुऱ्हाड आणि मृतकाचा मोबाईल सापडला आहे. या घटनेतील महिला ही ४ मुलांची आई असून तिला २ मुले आणि २ मुली आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्गापूर येथील अर्जुन उर्फ छोटे हा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका गोठ्यात रविवारी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी मोठा भाऊ जनावरांना चारा देण्यासाठी गोठ्यात पोहचला तेव्हा अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. 

मोठ्या भावाने सांगितले की, रात्री अर्जुनला फोन आला होता. गावातील बिटोला यादव आणि मुन्ना पांडे दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. मी दरवाजा उघडू नको असं सांगत त्यांना सकाळी भेटा असा निरोप द्यायला सांगितला. परंतु अर्जुननं ऐकलं नाही. तो घराबाहेर पडला. मुन्ना आणि बिटोला यांनी मिळून अर्जुनची हत्या केलीय असा आरोप करत भावाने मुन्ना पांडेय आणि बिटोला यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. 

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली. तो कधीही गावात यायचा तेव्हा बिटोलाला भेटायला जायचा. मुन्नाला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. तेव्हा त्याने बिटोलाला सोबत घेऊन अर्जुनचा काटा काढण्याचा ठरवले. त्या दोघांनी मिळून अर्जुनची हत्या केली. प्रथम दर्शनी हे हत्याचे प्रकरण वाटत असून पोलीस तपास करत आहेत अशी माहिती एएसपीने दिली. 

दिल्लीहून १५ दिवसांसाठी आला, २० तारखेला होतं लग्न 
अर्जुन दिल्लीला काम करायचा. १५ दिवसांपूर्वी तो दिल्लीहून आला होता. त्याचे २० फेब्रुवारीला लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाच्या आधीच अर्जुनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या घरातून वरात निघणार होते तिथेच अर्जुनची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. अर्जुन नेहमी लाला यादवकडून बिटोलासाठी पाठवलेले सामान दिल्लीहून घेऊन यायचा. त्यामुळे बिटोलासोबत अर्जुनची जवळीक वाढली. याचाच बदला घेण्यासाठी बिटोला प्रियकर मुन्ना पांडेयने महिलेसोबत मिळून अर्जुनची कुऱ्हाडीने हत्या केली. 

Web Title: The mother of 4 children killed boyfriend at banda UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.