शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

प्रेमासाठी काय पण! 50 हजार रोख, 2 लाखांचे दागिने घेऊन 2 मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळून गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:29 IST

पत्नी पळून गेल्यामुळे हैराण झालेल्या पतीने थेट पोलीस ठाणे गाठून पत्नीला परत मिळवून देण्याची पोलिसांना विनंती केली आहे.

नवी दिल्ली - बिहारमधील बगाहामध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. विवाहित महिला प्रियकरासह फरार झाली आहे. पत्नी पळून गेल्यामुळे हैराण झालेल्या पतीने थेट पोलीस ठाणे गाठून पत्नीला परत मिळवून देण्याची पोलिसांना विनंती केली आहे. आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहते, त्यामुळे पोलिसांनी पत्नीला परत आणावं, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पोलीसही संभ्रमात पडले आहेत. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बगहा येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील रहिवासी असलेले ओमप्रकाश राव जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतात. ओमप्रकाश जयपूरमध्ये असताना त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह फरार झाली. आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून ती निघून गेली. पती ओमप्रकाश घरी आल्यावर पत्नी प्रियकरासह फरार झाल्याची माहिती मिळाली. या घटनेने ओमप्रकाश यांनाही धक्का बसला. 

तब्बल 50 हजारांची रोकड आणि दोन लाखांचे दागिने घेऊन पत्नी फरार झाल्याचं पीडितेचा पती ओमप्रकाश याने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचवेळी पत्नीला दोन्ही मुलांचं यापुढे काय होऊल याबाबत काहीच वाटलं नाही आणि ती प्रियकरासह पळून गेल्याचं ओमप्रकाशने सांगितले. या घटनेने ओमप्रकाश खूप अस्वस्थ झाला आहे. तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.

ओमप्रकाश यांनी सांगितले की त्यांची पत्नी 7 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षाच्या मुलीला सोडून पळून गेली. नौरंगिया पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरवर कारवाई न झाल्याने ओमप्रकाश राव यांनी एसपीकडे तीनदा अर्ज केला आहे. ओमप्रकाश यांनी अर्ज देऊन डीआयजींकडेही दाद मागितली आहे. ओमप्रकाश राव यांनी सांगितले की, तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. पत्नीच्या विश्वासावर त्यांनी संपूर्ण कुटुंब इथेच ठेवलं होतं. याच दरम्यान, पत्नीचा एका तरुणाशी संपर्क आला आणि ती मुलांना सोडून पळून गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी