शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:25 IST

जन्माष्टमी निमित्ताने मंदिरात जात असल्याचे दोन्ही तरुणींनी कुटुंबीयांना सांगितले होते. रात्रभर त्या घरीच आल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

Crime news Marathi: जन्माष्टमीनिमित्त मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणींचे सकाळी मृतदेहच आढळून आले. या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. दोन्ही आमराईमध्ये एका आंब्याच्या झाडाला दोन्ही तरुणींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे. 

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील कायमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात घडली. भगौतीपूर येथे घडलेल्या घटनेमुळे सगळे गाव हादरले आहे. गावातील रहिवासी रामवीर जाटव यांची मुलगी बबली (वय १८) आणि महेंद्र जाटव यांची मुलगी शशि (वय १६) या दोन्ही तरुणींचे मृतदेह आढळून आले. 

घरातून बाहेर पडल्यानंतर मृतदेहच सापडले, काय घडलं?

बबली आणि शशि जन्माष्टमी निमित्त मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घरच्यांना मंदिरात चालल्याचे सांगून रात्री निघाल्या. पण परत आल्या नाही. 

बराच वेळ गेल्यानंतर दोघींच्या कुटुंबीयांनी त्यांची चौकशी केली पण काही कळू शकले नाही. त्यानंतर मावशीच्या घरी थांबल्या असतील, असा विचार करून त्यांनी शोध थांबवला. 

दरम्यान, मंगळवारी (27 ऑगस्ट) सकाळी आमराईमध्ये ग्रामस्थांना दोन मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. गावात खळबळ उडाली. सगळे लोक घटनास्थळी जमा झाले. 

काही लोकांनी जवळ जाऊन बघितल्यानंतर ते दोन्ही मृतदेह बबली आणि शशिचे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचले. 

कशा अवस्थेत होते मृतदेह?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली आणि शशिचा मृतदेह एकाच दुपट्ट्याने लटकलेल्या अवस्थेत होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. दोघींचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठवले असून, रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ