शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दीड कोटी मिळाले अन् ५५ हजारांसाठी जीव गेला; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 23:39 IST

महोबा जिल्ह्यातील ग्योडी गावात राहणाऱ्या २२ वर्षीय राजन कुटुंबात एकटा मुलगा होता. वडील धर्मेंद्र सिंह यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता.

महोबा – उत्तर प्रदेशातील महोबा इथं एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूनं राज्यात खळबळ माजली आहे. एकलुत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानं घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. मृत युवकाच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. युवकाच्या मित्रांनी १० दिवसांत त्याला ५५ हजारांची दारू पाजली. त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागले. मृत युवकाच्या आईला बुंदेलखेड एक्सप्रेस हायवेसाठी जमीन अधिग्रहण केल्यानं दीड कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळाली होती. है पैसे मिळाल्यानंतर मुलाला दारूचं व्यसन जडलं. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील ग्योडी गावात राहणाऱ्या २२ वर्षीय राजन कुटुंबात एकटा मुलगा होता. वडील धर्मेंद्र सिंह यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मृतकाला अल्पवयीन बहीण आहे ती शिक्षण घेतेय. २० मार्चला राजन अचानक गायब झाला होता. आईनं तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. त्यानंतर एकेदिवशी घराच्या जवळ असलेल्या विहिरीत राजनचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबाला धक्का बसला. त्याच्या शरीरावर अनेक मारहाणीच्या खूणा होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.  मुलाचा मृतदेह सापडल्याने आई बेशुद्ध झाली होती. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक पवन कुमार पटेल म्हणाले की, दीड कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळाल्यानंतर राजन मित्रांसोबत पार्टी करत होता. गेल्या १० दिवसांत त्याने ५५ हजाराची दारू प्यायली. त्यानंतर तो मानसिक तणावाखाली गेला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुंदेलखेड एक्सप्रेस हायवे बनवण्यासाठी युवकाच्या आईची ११ एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. त्यामुळे रानी सिंहला दीड कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळाली. त्यानंतर युवकाची आई रानी सिंह हिने मुलासाठी महोबा इथं ३२ लाख रुपये खर्च करून प्लॅट खरेदी केला. रमईपूर येथेही ७ लाखांची जमीन विकत घेतली. राजनच्या नावावरही ५ एकर जमीन होती. परंतु मित्रांच्या नादी लागून तो वाईट संगतीला गेला. राजनच्या मित्रांनी त्याला जाळ्यात अडकवत दारूचं व्यसन लावलं. त्याच्यावर ५५ हजारांचे कर्ज झाले. ते मित्र मागत होते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता. राजनच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश