शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:32 IST

या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शनमध्ये होते. त्या तिघी मैत्रिणी होत्या, त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती.

मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूर इथं राहणाऱ्या ३ मुली १५ दिवसांपूर्वी घरातून पळाल्या. या तिघीही मैत्रिणी होत्या. त्यातील एका मुलीनं घर सोडताना एक चिठ्ठी लिहिली. त्यात असं काही लिहिलं होतं, ज्यानं कुणीही या तिघींना शोधण्याची हिंमत केली नाही. त्यातच मथुरा इथं ३ मुलींचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या मृतदेहांचे मुझफ्फरपूर कनेक्शन आहे का याचा तपास सुरू झाला आहे.

मुझफ्फरपूर येथील योगिया मठापासून अचानक ३ मुली गायब झाल्या. त्यांचं नाव माया, गौरी आणि माही होतं. मथुरा येथील रेल्वे ट्रॅकवर जे ३ मृतदेह सापडले आहेत ते मुझफ्फरपूर येथून पळालेल्या त्याच मुलींचे असल्याचं बोललं जातं. मात्र यावर अधिकृत माहिती आली नाही. या मृतदेहांच्या DNA चाचणीनंतरच स्पष्ट होईल असं पोलीस सांगतायेत. काही दिवसांपूर्वी ३ मुली अचानक बेपत्ता झाल्याने मुझफ्फरपूर येथे खळबळ माजली होती. 

या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शनमध्ये होते. त्या तिघी मैत्रिणी होत्या, त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, आम्ही तिघी हिमालय अथवा लालगंज येथे जातोय. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही विष पिऊ. जर कुणी शोधण्याचा प्रयत्न केला तर विष पिऊन आम्ही आत्महत्या करू असं लिहिल्याने घरच्यांना धक्का बसला. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. त्यात या मुलींचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशात असल्याचं आढळलं. 

दरम्यान, या मुली बेपत्ता झाल्यानंतर मथुरा येथे रेल्वे ट्रॅकवर मुलींचे मृतदेह सापडले. या तिन्ही मुलींच्या हातावर मेहंदी होती. एका युवतीच्या हातावर SBG असं लिहिलं होतं. त्याचसोबत पोलिसांना मृतदेहाच्या कपड्यांमध्ये ग्लोब टेलर मुझफ्फरपूर असं लिहिलेलं स्टिकरही सापडले. त्यामुळे मुझफ्फरपूर येथून पळालेल्या या तिन्ही मुलींचेच हे मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु डिएनए चाचणीशिवाय याची अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी