शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 23:18 IST

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही.

ठाणे- येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील बेपत्ता झालेली एक महिला तब्बल 4 वर्षांनंतर सापडली. यानंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. कारण, ती महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. (Thane woman missing from train found after 4 years)

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर, जेव्हा 4 वर्षांनी तिचा पत्ता मिळाला आणि संपूर्ण प्रकरण तिच्या कुटुंबीयांना समजले, तेव्हा त्यांना मोठा हादराच बसला. ही महिला आपल्या प्रियकरासोबत तब्बल चार वर्षांपासून राहत असलेले तिच्या कुटुंबीयांना समजले. 

असे आहे संपूर्ण प्रकरण -सांगण्यात येते, की ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील एका कंपनीत शाहबाज शेख आणि सीमा कोष्टी सोबतच काम करत होते. अंबरनाथमध्ये राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून म्हणजेच मनमाडवरून रेल्वेने येत असतानाच अचानकच बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातलगांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली.

याचदरम्यान कल्याणमध्ये राहणारा शहबाज शेख देखील बेपत्ता झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाहबाज शेख आणि त्याच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली. अखेर चार वर्षांनंतर पोलिसांना माहिती मिळाली, की कल्याण येथे राहणाऱ्या शाहबाज शेखच्या  काकांचा मृत्यू झाला आहे आणि शाहबाज शेख अपली पत्नी सनासह कल्याणमध्ये आला आहे. 

माहिती मिळताच पोलीस थेट शाहबाज शेखच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी शाहबाजची पत्नी सनाची चौकशी केली. यावर, आपण सना नसून सिमाच आहोत, अशी कबुली तिने दिली. तिने सांगितले, की मनमाडवरून फरार झाल्यानंतर तिने शाहबाजसोबत लग्न केले आणि सीमाची सना झाली. सध्या प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली  पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणेkalyanकल्याण