शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 23:18 IST

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही.

ठाणे- येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील बेपत्ता झालेली एक महिला तब्बल 4 वर्षांनंतर सापडली. यानंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. कारण, ती महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. (Thane woman missing from train found after 4 years)

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर, जेव्हा 4 वर्षांनी तिचा पत्ता मिळाला आणि संपूर्ण प्रकरण तिच्या कुटुंबीयांना समजले, तेव्हा त्यांना मोठा हादराच बसला. ही महिला आपल्या प्रियकरासोबत तब्बल चार वर्षांपासून राहत असलेले तिच्या कुटुंबीयांना समजले. 

असे आहे संपूर्ण प्रकरण -सांगण्यात येते, की ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील एका कंपनीत शाहबाज शेख आणि सीमा कोष्टी सोबतच काम करत होते. अंबरनाथमध्ये राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून म्हणजेच मनमाडवरून रेल्वेने येत असतानाच अचानकच बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातलगांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली.

याचदरम्यान कल्याणमध्ये राहणारा शहबाज शेख देखील बेपत्ता झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाहबाज शेख आणि त्याच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली. अखेर चार वर्षांनंतर पोलिसांना माहिती मिळाली, की कल्याण येथे राहणाऱ्या शाहबाज शेखच्या  काकांचा मृत्यू झाला आहे आणि शाहबाज शेख अपली पत्नी सनासह कल्याणमध्ये आला आहे. 

माहिती मिळताच पोलीस थेट शाहबाज शेखच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी शाहबाजची पत्नी सनाची चौकशी केली. यावर, आपण सना नसून सिमाच आहोत, अशी कबुली तिने दिली. तिने सांगितले, की मनमाडवरून फरार झाल्यानंतर तिने शाहबाजसोबत लग्न केले आणि सीमाची सना झाली. सध्या प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली  पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणेkalyanकल्याण