शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडे तीन हजार जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:36 IST

ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभार्इंदरमध्ये सर्वाधिक दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे४२ दिवसांमध्ये ७४५ गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७४५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात संचारबंदीचे उल्लंघन करणे, विनाकारण वाहने रस्त्यांवर आणणे, कोरोनाची लक्षणे असतांना तसेच विलगीकरणात ठेवलेले असतांनाही बाहेर फिरणे अशा अनेक कारणांमुळे साथ प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ तसेच कलम २६९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. २२ मार्च ते ५ मे २०२० या ४२ दिवसांच्या कालावधीमध्ये मीरा रोडमध्ये ९८१ आरोपींविरुद्ध ३०२ गुन्हे दाखल झाले. तर भार्इंदरमध्ये दोन हजार १३५ जणांविरुद्ध २७१ गुन्हे नोंदविले गेले. शहापूरात २०८ जणांविरुद्ध ८५ गुन्हे, मुरबाडमध्ये १२४ जणांविरुद्ध ४३ तर गणेशपूरी विभागात ९१ जणांविरुद्ध ४४ गुन्हयांची नोंद झाली. याशिवाय, मनाई आदेशाचा भंग करणा-या तिघांविरुद्ध तर औषध द्रव्य कलमाखाली मुरबाडमधील दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस