शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडे तीन हजार जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:36 IST

ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभार्इंदरमध्ये सर्वाधिक दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे४२ दिवसांमध्ये ७४५ गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७४५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात संचारबंदीचे उल्लंघन करणे, विनाकारण वाहने रस्त्यांवर आणणे, कोरोनाची लक्षणे असतांना तसेच विलगीकरणात ठेवलेले असतांनाही बाहेर फिरणे अशा अनेक कारणांमुळे साथ प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ तसेच कलम २६९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. २२ मार्च ते ५ मे २०२० या ४२ दिवसांच्या कालावधीमध्ये मीरा रोडमध्ये ९८१ आरोपींविरुद्ध ३०२ गुन्हे दाखल झाले. तर भार्इंदरमध्ये दोन हजार १३५ जणांविरुद्ध २७१ गुन्हे नोंदविले गेले. शहापूरात २०८ जणांविरुद्ध ८५ गुन्हे, मुरबाडमध्ये १२४ जणांविरुद्ध ४३ तर गणेशपूरी विभागात ९१ जणांविरुद्ध ४४ गुन्हयांची नोंद झाली. याशिवाय, मनाई आदेशाचा भंग करणा-या तिघांविरुद्ध तर औषध द्रव्य कलमाखाली मुरबाडमधील दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस