शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश

By अजित मांडके | Updated: August 24, 2022 16:25 IST

ठाणे पोलिसांनी तब्बल १४ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापुर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले १४ लाखांचे ७० मोबाईल हस्तगत करण्यात ठाणे शहर पोलीस दलातील खंडणी विरोधी पथक, व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांना यश आले आहे. ज्या नागरीकांचे फोन चोरीस किंवा गहाळ झाले असतील त्यांनी पोलिसांच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीला जाणे गहाळ होणे असे प्रकार वाढले होते. शहर पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी याबाबत आढावा बैठक घेत, त्या मोबाईलचा व आरोपींचा शोध घेण्याबाबत विशेष मोहिम राबवण्याचे आदेश खंडणी विरोधी पथक व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेला दिले होते. यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक करून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचे त्यांच्या आयएमईआय नंबरवरून तसेच दुरसंचार विभाग, भारत सरकारकडून, चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईलबाबत असलेल्या वेबसाईटच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाने १२ लाख ४० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ५५ मोबाईल जप्त केले आहेत. 

७० मोबाईल केले हस्तगत तसेच मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेने एकूण १ लाख ५० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण १५ मोबाईल असे एकूण १३ लाख ९० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ७० मोबाईल हस्तगत केले आहेत. ही कामिगरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान सोनवणो आदींसह इतर पथकाने केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसMobileमोबाइल