शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये तुरुंगांतील अतिरिक्त गर्दीचा दहा वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:19 IST

भारतीय कारागृहांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा अधिक कैदी

नवी दिल्ली : भारतातील तुरुंगांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असले तरी तुरुंगांतील ही अतिरिक्त गर्दी आता विकोपाला गेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने (एनसीआरबी) याच आठवड्यात जारी केलेल्या २0१९ मधील गुन्हेगारीविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. ३१ डिसेंबर २0१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील तुरुंगांत ४,७८,६00 कैदी आहेत.

कैदी सामावून घेण्याची तुरुंगांची वास्तवातील एकत्रित क्षमता मात्र केवळ ४,0३,७00 इतकी आहे. याचाच अर्थ भारतीय तुरुंगांतील कैद्यांची संख्या ११८.५ टक्के अधिक आहे. २0१0 पासूनच्या काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. २0१८ पेक्षा हा आकडा १ टक्क्याने जास्त आहे.

क्षमतेक्षा जास्त कैदी असलेल्या राज्यांची संख्या २0१८ मध्ये १८ होती. २0१९ मध्ये ती २१ झाली आहे. ११ राज्यांतील तुरुंगांत सलग पाचव्या वर्षी क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. दिल्लीतील तुरुंगांत सर्वाधिक अतिरिक्त गर्दी दिसून आली. १0 हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना दिल्लीतील तुरुंगांत १७,५00 कैदी डांबण्यात आले आहेत. येथील अतिरिक्त गर्दीचे प्रमाण १७५ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशात १६८ टक्के आणि तिसºया क्रमांकावरील उत्तराखंडमध्ये १५८ टक्के कैद्यांची अतिरिक्त गर्दी आहे.

५0 पेक्षा अधिक वय असलेले कैदी अधिक

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांतील अतिरिक्त गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. देशातील अनेक तुरुंगांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय तुरुंगांतील प्रत्येक आठ कैद्यांमागे १ कैदी ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास घातक गुंतागुंत होण्याचा सर्वाधिक धोका असतो. विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेच्या संचालिका नेहा सिंघल यांनी सांगितले की, तुरुंगांतील कैद्यांची अतिरिक्त गर्दी तातडीने कमी करण्याची गरज आहे. तुरुंगांचे व्यवस्थापन नेहमीच कठीण असते, पण आताच्या परिस्थितीत व्यवस्थापनासाठी दुस्वप्न ठरू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस