शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

२०१९ मध्ये तुरुंगांतील अतिरिक्त गर्दीचा दहा वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:19 IST

भारतीय कारागृहांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा अधिक कैदी

नवी दिल्ली : भारतातील तुरुंगांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असले तरी तुरुंगांतील ही अतिरिक्त गर्दी आता विकोपाला गेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने (एनसीआरबी) याच आठवड्यात जारी केलेल्या २0१९ मधील गुन्हेगारीविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. ३१ डिसेंबर २0१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील तुरुंगांत ४,७८,६00 कैदी आहेत.

कैदी सामावून घेण्याची तुरुंगांची वास्तवातील एकत्रित क्षमता मात्र केवळ ४,0३,७00 इतकी आहे. याचाच अर्थ भारतीय तुरुंगांतील कैद्यांची संख्या ११८.५ टक्के अधिक आहे. २0१0 पासूनच्या काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. २0१८ पेक्षा हा आकडा १ टक्क्याने जास्त आहे.

क्षमतेक्षा जास्त कैदी असलेल्या राज्यांची संख्या २0१८ मध्ये १८ होती. २0१९ मध्ये ती २१ झाली आहे. ११ राज्यांतील तुरुंगांत सलग पाचव्या वर्षी क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. दिल्लीतील तुरुंगांत सर्वाधिक अतिरिक्त गर्दी दिसून आली. १0 हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना दिल्लीतील तुरुंगांत १७,५00 कैदी डांबण्यात आले आहेत. येथील अतिरिक्त गर्दीचे प्रमाण १७५ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशात १६८ टक्के आणि तिसºया क्रमांकावरील उत्तराखंडमध्ये १५८ टक्के कैद्यांची अतिरिक्त गर्दी आहे.

५0 पेक्षा अधिक वय असलेले कैदी अधिक

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांतील अतिरिक्त गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. देशातील अनेक तुरुंगांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय तुरुंगांतील प्रत्येक आठ कैद्यांमागे १ कैदी ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास घातक गुंतागुंत होण्याचा सर्वाधिक धोका असतो. विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेच्या संचालिका नेहा सिंघल यांनी सांगितले की, तुरुंगांतील कैद्यांची अतिरिक्त गर्दी तातडीने कमी करण्याची गरज आहे. तुरुंगांचे व्यवस्थापन नेहमीच कठीण असते, पण आताच्या परिस्थितीत व्यवस्थापनासाठी दुस्वप्न ठरू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस