शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

२०१९ मध्ये तुरुंगांतील अतिरिक्त गर्दीचा दहा वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:19 IST

भारतीय कारागृहांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा अधिक कैदी

नवी दिल्ली : भारतातील तुरुंगांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असले तरी तुरुंगांतील ही अतिरिक्त गर्दी आता विकोपाला गेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने (एनसीआरबी) याच आठवड्यात जारी केलेल्या २0१९ मधील गुन्हेगारीविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. ३१ डिसेंबर २0१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील तुरुंगांत ४,७८,६00 कैदी आहेत.

कैदी सामावून घेण्याची तुरुंगांची वास्तवातील एकत्रित क्षमता मात्र केवळ ४,0३,७00 इतकी आहे. याचाच अर्थ भारतीय तुरुंगांतील कैद्यांची संख्या ११८.५ टक्के अधिक आहे. २0१0 पासूनच्या काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. २0१८ पेक्षा हा आकडा १ टक्क्याने जास्त आहे.

क्षमतेक्षा जास्त कैदी असलेल्या राज्यांची संख्या २0१८ मध्ये १८ होती. २0१९ मध्ये ती २१ झाली आहे. ११ राज्यांतील तुरुंगांत सलग पाचव्या वर्षी क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. दिल्लीतील तुरुंगांत सर्वाधिक अतिरिक्त गर्दी दिसून आली. १0 हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना दिल्लीतील तुरुंगांत १७,५00 कैदी डांबण्यात आले आहेत. येथील अतिरिक्त गर्दीचे प्रमाण १७५ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशात १६८ टक्के आणि तिसºया क्रमांकावरील उत्तराखंडमध्ये १५८ टक्के कैद्यांची अतिरिक्त गर्दी आहे.

५0 पेक्षा अधिक वय असलेले कैदी अधिक

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांतील अतिरिक्त गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. देशातील अनेक तुरुंगांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय तुरुंगांतील प्रत्येक आठ कैद्यांमागे १ कैदी ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास घातक गुंतागुंत होण्याचा सर्वाधिक धोका असतो. विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेच्या संचालिका नेहा सिंघल यांनी सांगितले की, तुरुंगांतील कैद्यांची अतिरिक्त गर्दी तातडीने कमी करण्याची गरज आहे. तुरुंगांचे व्यवस्थापन नेहमीच कठीण असते, पण आताच्या परिस्थितीत व्यवस्थापनासाठी दुस्वप्न ठरू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस