शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:03 IST

देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

- जमीर काझी मुंबई : देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा महिन्यांत ऑनलाइन गैरव्यवहार, फसवणुकीच्या तब्बल २,७८९ गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे. साधारणपणे दररोज १० सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल होत आहेत. १ जानेवारी, २०१५ ते ३१ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत एकूण तब्बल १०,१३९ गुन्हे दाखल झाले आहेत.

राज्यभरात डेबिट, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक फसवणुकीबरोबरच नोकरी, विवाह नोंदणीबरोबरच सोशल मीडियातील गुन्ह्यांच्या प्रमाणाचा आलेख सातत्याने वाढत राहिलेला आहे. त्यावर प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्याला मर्यादा पडत आहेत, तसेच नागरिकही आपल्या सायबर सुरक्षेबाबत गाफील राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.

माहिती अधिकार तंत्रज्ञान कायद्यांतर्गत या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर दहा महिन्यांमध्ये एकूण २,७८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९८६ गुन्हे आॅनलाइन बॅँकिंगचे आहेत. त्यानंतर डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ८३३ तक्रारींची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल सोशल मीडियाद्वारे फसवणूक झालेले ७७९ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फसवणुकीचे ५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सायबर गुन्ह्याच्या प्रतिबंध व तपासासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये इंटरनेट व आॅनलाइनचा वापर कैकपटीने वाढत आहे. त्याचा वापर करणाऱ्यांनी त्यासंबंधी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. बॅँक खाते, ओटीपी क्रमांक इतरांना सांगू नयेत, त्यासंबंधी खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे.- बाळसिंग रजपूत, अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग

या वर्षी ३१ ऑक्टोबरअखेर दाखल सोशल मीडिया व ई-मेलसंबंधी गुन्हे

प्रकार गुन्हे

सोशल मीडिया ५४९ई-मेल २४अन्य २०६एकूण ७७९

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस