शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:07 IST

सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले

अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लग्न समारंभात तंदूरी रोटीवरून २ युवकांमध्ये वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झाले आणि त्यातच दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अमेठीतील बलभद्रपूर गावात ही घटना घडली जिथं एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदात विरजन पडले. 

शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होते. वऱ्हाड आले, लग्नाच्या सर्व विधी सुरू होत्या. परंतु जेवणावेळी जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तंदूरी रोटी घेण्यावरून २ युवक भिडले. १८ वर्षीय रवी कुमार आणि १७ वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले. या हाणामारीत आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर मारहाणीत जखमी झालेला रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेले परंतु वाटेतच त्याने जीव सोडला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले.

दरम्यान, लग्नाच्या एका सोहळ्यात २ युवकांमध्ये मारहाण झाली. ज्यात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. तक्रार आणि पोस्टमोर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू केला जाईल. या प्रकरणी जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गौरीगंज सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी