शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:07 IST

सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले

अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लग्न समारंभात तंदूरी रोटीवरून २ युवकांमध्ये वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झाले आणि त्यातच दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अमेठीतील बलभद्रपूर गावात ही घटना घडली जिथं एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदात विरजन पडले. 

शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होते. वऱ्हाड आले, लग्नाच्या सर्व विधी सुरू होत्या. परंतु जेवणावेळी जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तंदूरी रोटी घेण्यावरून २ युवक भिडले. १८ वर्षीय रवी कुमार आणि १७ वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले. या हाणामारीत आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर मारहाणीत जखमी झालेला रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेले परंतु वाटेतच त्याने जीव सोडला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले.

दरम्यान, लग्नाच्या एका सोहळ्यात २ युवकांमध्ये मारहाण झाली. ज्यात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. तक्रार आणि पोस्टमोर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू केला जाईल. या प्रकरणी जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गौरीगंज सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी