शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:07 IST

सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले

अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लग्न समारंभात तंदूरी रोटीवरून २ युवकांमध्ये वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झाले आणि त्यातच दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अमेठीतील बलभद्रपूर गावात ही घटना घडली जिथं एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदात विरजन पडले. 

शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होते. वऱ्हाड आले, लग्नाच्या सर्व विधी सुरू होत्या. परंतु जेवणावेळी जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तंदूरी रोटी घेण्यावरून २ युवक भिडले. १८ वर्षीय रवी कुमार आणि १७ वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले. या हाणामारीत आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर मारहाणीत जखमी झालेला रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेले परंतु वाटेतच त्याने जीव सोडला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले.

दरम्यान, लग्नाच्या एका सोहळ्यात २ युवकांमध्ये मारहाण झाली. ज्यात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. तक्रार आणि पोस्टमोर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू केला जाईल. या प्रकरणी जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गौरीगंज सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी