शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुशांतची आत्महत्या मानसिक समस्येतून - मानसोपचार तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:41 IST

सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा, तसेच सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्यामागे काही घातपात होता, याचा तपास सीबीआय करत आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे केलेल्या चौकशीतून या बाबी समोर आल्या आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमागे अनेक प्रकारच्या मानसिक समस्या असू शकतात. त्यात नैराश्य, अपयश, चिंता, नकारात्मकता, भूतकाळात गमावलेली माणसे, त्यांची पोकळी अशा अनेक कारणांचा समावेश आहे. त्याला निद्रानाश, चिंता, भूक न लागणे अशी लक्षणे होती. अपेक्षेप्रमाणे काही घडत नसल्याने त्याला असुरक्षित वाटत होते, असा खुलासा त्याच्यावर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी सीबीआयंसमोर केल्याचे समजते.सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा, तसेच सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्यामागे काही घातपात होता, याचा तपास सीबीआय करत आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे केलेल्या चौकशीतून या बाबी समोर आल्या आहेत.आपल्या आजारामुळे कुटुंबियांना त्रास होईल, अशी सुशांतची भावना होती. सुशांतच्या प्रकृतीविषयी कळविण्यासाठी सातत्याने अभिनेत्री रिया चक्रवर्ती संपर्कात असल्याचेही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. एका मानसोपचार तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, आठ जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले, त्यावेळेस त्याची बहिण मितू सिंग तिथे राहायला आली. त्यावेळी रियाने सुशांतच्या प्रकृतीविषयी मेसेज करून तो नैराश्यग्रस्त असल्याचे कळवत प्रिस्क्रि प्शन पाठवून औषधे घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुशांतने ते अमान्य केले आणि रियाच्या फोनवरु न व्हिडीओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क केला होता. डॉक्टरांनी औषधे घेणे थांबविल्याविषयी सुशांतला कॉलवर विचारले असता त्याने स्पष्ट सांगण्यास नकार दर्शविला.औषध घेणे थांबविले होतेसुशांत पहिल्यांदा नोव्हेंबर २0१९ मध्ये उपचारांसाठी आला होता. त्यावेळी तपासणीदरम्यान तो नैराश्यावस्थेत असल्याचे निदान झाले. मात्र सुशांतने औषध घेणे थांबविल्याने उपचारांमध्ये अडथळे निर्माण होत होते, असा खुलासाही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारी