शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रिक्षा खड्ड्यामुळे पलटी; अपघाताचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद .. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:29 IST

Accident Case : अपघाताचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देया रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत आपण वेळोवेळी एमएससीआरडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची तक्रार देखील अनेक वेळा केली आहे.हे दुर्दैव असून यापुढे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे. 

नितिन पंडीत

भिवंडी -  भरधाव रिक्षा खड्यात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना भिवंडी कल्याण महामार्गावर घडली असून हा अपघात व्हिडीओ एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून अपघाताचा हा व्हिडीओ मागील दहा दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

भिवंडी कल्याण मार्गावर मागील तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव छाप गतीने काम सुरू आहे. त्यामुळे यामार्गावर अनेक अपघात होऊन कोणी जखमी झाले तर अनेकांचे  जीवही गेले आहेत. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे आहे. असाच एक खड्डा कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर आहे. याच खड्यामुळे १० दिवसापूर्वी रिक्षा पटली होऊन अपघात झाला होता. याप्रकरणी त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्याच अपघाताच्या थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सध्या ठेकेदाराकडून हा खड्डा पेव्हरब्लॉक च्या माध्यमातून भरण्यात आला आहे. मात्र अपघाताचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

दरम्यान या रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत आपण वेळोवेळी एमएससीआरडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची तक्रार देखील अनेक वेळा केली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाही.  हे दुर्दैव असून यापुढे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे. 

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून या खड्डेमय रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री येत असतात मात्र मंत्र्यांची पाठ फिरली की परिस्थिती जैसे थे अशीच होते त्यामुळे येथील खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPotholeखड्डेbhiwandiभिवंडीMobileमोबाइल