मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला नंदगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका ढाब्यावरून अटक केली. गाझीपूर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम ढाब्यावर पोहोचली आणि तिथे काम करणाऱ्या साहिल यादवकडे मोबाईल मागितला आणि तिचा भाऊ गोविंद रघुवंशीशी संपर्क साधला.
साहिल म्हणाला, "सोनम रात्री १ वाजता ढाब्यावर आली, खूप घाबरली होती आणि रडत म्हणाली की, तिला घरी फोन करायचा आहे. मी तिला माझा मोबाईल दिला, ती तिच्या कुटुंबाशी बोलली. मग मी तिला बसण्यास सांगितलं आणि पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आले आणि तिला घेऊन गेले. सोनम एकटी होती आणि तिने ती कुठून आली आहे किंवा कुठे जात आहे हे सांगितलं नाही."
सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
उत्तर प्रदेश पोलिसांचे ADG अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिच्या कुटुंबाला इंदूरमध्ये फोन करून तिच्याबाबत माहिती दिली. कुटुंबाने इंदूर पोलिसांना माहिती दिली, ज्यांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला. सोनमला प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर सखी वन स्टॉप सेंटरमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. इंदूर आणि मेघालय पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे आणि दोन्ही राज्यांचं पोलीस पथक गाझीपूरला पोहोचत आहेत.
"सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "जर सोनमने आमच्या मुलाला मारलं असेल तर तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कोणती पत्नी सांगेल की जा आणि चेन घेऊन या. सोनमनेच प्लॅन केलेला असणार. ज्यांना पकडण्यात आलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. लग्नानंतर घरात सोनमचं वागणं खूपच चांगलं होतं. ती असं काही करू शकते यावर आमचा अजूनही विश्वासच बसत नाही" असं राजाच्या आईने म्हटलं आहे.