शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिमुकल्याचं अपहरण करणारे अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 14:29 IST

सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

ठळक मुद्देअपहृत मुलाचं नाव आशिक चंदुल हरजन असे आहे.ते दोघे रेकॉर्डवरील वाहन चोर गुन्हेगार असून त्यांनी झालेले कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ठाणे - भिवंडी येथून एक मुलाचे अपहरण करणाऱ्या रोहित प्रदीप कोटेकर आणि सूरज सोनी या दुकलीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच अपहृत मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आणि पोलिसांनी मुलाला पालकांकडे सोपवलं आहे. अपहृत मुलाचं नाव आशिक चंदुल हरजन असे आहे. ते दोघे रेकॉर्डवरील वाहन चोर गुन्हेगार असून त्यांनी झालेले कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक