शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

मुंबईतून पळालेली भावंडे ग्वाल्हेरमधूनही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 07:04 IST

रिक्षाचालकाला अटक; मुलांचा शोध सुरू

ग्वाल्हेर : चार भावंडे मुंबईतील त्यांच्या घरातून पळून गेली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात रेल्वेतून उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, त्याने मात्र बालसंगोपन केंद्रात मुलांना सोडल्याचा दावा केला आहे.

जनकगंजचे पोलिस निरीक्षक विजेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक ८ ते १८ वयोगटातील तीन मुली आणि एका मुलाचा शोध घेण्यासाठी ग्वाल्हेर येथे दाखल झाले आहे. ही भावंडे २७ मे रोजी रेल्वेमधून उतरल्यापासून बेपत्ता आहेत.

मुंबई पोलिस दिलीप धकटा नावाच्या ऑटोरिक्षा चालकाची चौकशी करत आहेत. त्याने लक्ष्मीगंज परिसरातील बाल संगोपन केंद्रात मुलांना सोडल्याचा दावा केला आहे. ग्वाल्हेर स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकाला अटक केली, असे चौहान म्हणाले.

बालसंगोपन केंद्राचे कानावर हातमाधव बाल निकेतनच्या अध्यक्षा नूतन श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या पथकाने २७ मे रोजी पंजाब मेलने प्रवास केलेल्या चार मुलांची चौकशी करण्यासाठी केंद्राला भेट दिली. आम्ही फक्त (जिल्हा) बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसार मुलांना प्रवेश देतो. या चार मुलांना आमच्या केंद्रात सोडण्यात आले नाही. पोलिस केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील तपासत आहेत. पत्रकारांशी बोलताना, ऑटोरिक्षा चालकाने दावा केला की, त्यांनी मुलांना २७ मे रोजी बालसंगोपन केंद्रात सोडले होते.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी