शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

...तर श्रद्धा आज जिवंत असती; मुलीच्या आठवणी सांगताना धाय मोकलून बाप रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:28 IST

कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले.

श्रद्धा विकास वालकर मर्डर केसमध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अत्यंत क्रूरपणे श्रद्धाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ५ दिवसांच्या कोठडीत पाठवलं आहे. त्यात श्रद्धाच्या आठवणीत बाप धाय मोकलून रडला. जर श्रद्धानं ऐकलं असते तर कदाचित ती आज जिवंत असती असं तपासात पुढे आले. 

ही बाब श्रद्धाच्या वडिलांनी सांगितली. विकास वालकर म्हणाले की, मुलगी आणि आफताफ पूनावालाच्या अफेअरबाबत १८ महिन्यापूर्वी आम्हाला कळालं. मुलीने २०१९ मध्ये तिच्या आईला आफताबसोबतच्या लिव्ह इन रिलेशनशिपचं सांगितले. त्याचा मी आणि माझ्या पत्नीने विरोध केला. आमचा विरोध पाहून श्रद्धानं आम्हाला प्रत्युत्तर दिले. मी २५ वर्षांची झालीय, मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचं. मी आता तुमची मुलगी नाही असं सांगत तिने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिला अडवलं पण तिने आमचं ऐकलं नाही असं त्यांनी सांगितले. 

मुलीच्या जाण्यानंतर तिच्या मित्रांकडून कळालं की, ते दोघं महाराष्ट्रात वसई येथे राहत होते. कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर एकदा-दोनदा श्रद्धाने वडिलांना फोन केला. आफताबच्या वर्तवणुकीबाबत तिने सांगितले. मी आफताबला सोडून परत येण्यास सांगितले पण आफताबच्या मनवण्याने ती परत तिथेच थांबायची असं त्यांनी सांगितले. काय आहे प्रकरण?वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते व दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. ४ ते ५ दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू झाली होती.आफताब याने १८ मे ला श्रद्धा हिचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही. आफताब याला माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी व तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.