शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

...तर श्रद्धा आज जिवंत असती; मुलीच्या आठवणी सांगताना धाय मोकलून बाप रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:28 IST

कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले.

श्रद्धा विकास वालकर मर्डर केसमध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अत्यंत क्रूरपणे श्रद्धाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ५ दिवसांच्या कोठडीत पाठवलं आहे. त्यात श्रद्धाच्या आठवणीत बाप धाय मोकलून रडला. जर श्रद्धानं ऐकलं असते तर कदाचित ती आज जिवंत असती असं तपासात पुढे आले. 

ही बाब श्रद्धाच्या वडिलांनी सांगितली. विकास वालकर म्हणाले की, मुलगी आणि आफताफ पूनावालाच्या अफेअरबाबत १८ महिन्यापूर्वी आम्हाला कळालं. मुलीने २०१९ मध्ये तिच्या आईला आफताबसोबतच्या लिव्ह इन रिलेशनशिपचं सांगितले. त्याचा मी आणि माझ्या पत्नीने विरोध केला. आमचा विरोध पाहून श्रद्धानं आम्हाला प्रत्युत्तर दिले. मी २५ वर्षांची झालीय, मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचं. मी आता तुमची मुलगी नाही असं सांगत तिने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिला अडवलं पण तिने आमचं ऐकलं नाही असं त्यांनी सांगितले. 

मुलीच्या जाण्यानंतर तिच्या मित्रांकडून कळालं की, ते दोघं महाराष्ट्रात वसई येथे राहत होते. कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर एकदा-दोनदा श्रद्धाने वडिलांना फोन केला. आफताबच्या वर्तवणुकीबाबत तिने सांगितले. मी आफताबला सोडून परत येण्यास सांगितले पण आफताबच्या मनवण्याने ती परत तिथेच थांबायची असं त्यांनी सांगितले. काय आहे प्रकरण?वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते व दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. ४ ते ५ दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू झाली होती.आफताब याने १८ मे ला श्रद्धा हिचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही. आफताब याला माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी व तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.