शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

धक्कादायक! डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:50 IST

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ...

ठळक मुद्देसापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. यांची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून डोंबिवलीत टाकण्यात आला.

विष्णूनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पांडुरंग पाटील (५६) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते संतोषी माता सोसायटी, A/ 3 , कोपरी ठाणे येथे राहत होते.4 तारखेला पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात उमेश पाटील हे हरवल्याची नोंद केली.पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते डोंबिवली शहरात असल्याचे दिसले. त्यांचा मृतदेह डोंबिवलीत सापडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांनी कोपरी पोलीस ठाण्याला कळवले असता तेथील पोलिसांनी पाटील यांच्या घरच्यांना याची माहिती दिली. घरच्यांना मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूdombivaliडोंबिवलीthaneठाणेPoliceपोलिस