शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

वाह रे न्याय! शंख वाजव, गायत्री मंत्राचा जप कर, पत्नीची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला पोलिसांचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 10:02 IST

एसएचओ प्रेमचंदवर आरोप आहे की, एका कौटुंबिक वादात त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तीला गायत्र मंत्राचा जाप करण्यास सांगितले.

उत्तर प्रदेश एक असं राज्य आहे जेथून गुन्हे विश्वातील सर्वात जास्त आणि सर्वात विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. येथील मेरठमधील नौचंदी पोलीस स्टेशन तर नेहमीच चर्चेत असतं. याचं कारण म्हणजे एसएचओ प्रेमचंद शर्मा यांचं वागणं. प्रेमचंद शर्मा हे याआधी तक्रारदाराला चंदनाचा टीळा लावल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर होळीला पीडित व्यक्तीला गंगाजल देण्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा त्यांचा एक कारनामा समोर आला आहे. हे कारनामे असे आहेत जणू वाटतं की, हे पोलीस स्टेशनचे अधिकारी नाही तर मंदिराचे पुजारी आहेत. 

एसएचओ प्रेमचंदवर आरोप आहे की, एका कौटुंबिक वादात त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तीला गायत्र मंत्राचा जाप करण्यास सांगितले. तसेच हरिद्वारला जा, टीळा लावत जात असा सल्ला दिला. इतकेच नाही तर त्यांनी पीडित व्यक्तीला स्वत: गायत्री मंत्र लिहून दिला आणि १०८ वेळा गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितले.

यानंतर एसएचओची तक्रार घेऊन पीडित व्यक्ती वकिलासोबत मेरठच्या आयजी कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी न्यायाची मागणी केली. पीडित व्यक्तीच्या वकिलाने सांगितले की, आयजी साहेबांनी पीडित व्यक्तीची तक्रार लिहून घेतली.शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय हेमंत गोयलचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. हेमंत गोयलचा आरोप आहे की,  ते एकटे राहत होते आणि त्यांच्या शेजारच्या महिलेने एका सविता नावाच्या महिलेसोबत त्यांची भेट करून दिली. तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला एक १९ वर्षाचा मुलगा आहे.

हेमंत गोयलचा आरोप आहे की, त्यांची फसवणूक करून त्यांच्यासोबत महिलेने लग्न केलं. त्यांनीही वय बघता ऑक्टोबर २०२० मध्ये सवितासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. त्यांची पत्नी आणि सावत्र मुलगा त्यांना मारहाण करू लागले. तसेच पैशांसाठी दबाव टाकू लागले.

याचीच तक्रार घेऊन ते मेरठच्या नौचंदी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पण एसएचओ प्रेमचंद यांनी वेगळाच सल्ला दिला. हेमंत गोयल यांचा आरोप आहे की, नौचंदी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने त्यांची तक्रार लिहून घेण्याऐवजी, कायदेशीर कारवाई करण्याऐवजी शंख वाजवण्याचा, टीळा लावण्याचा, गंगाजल पिण्याचा आणि गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला. सोबतच हरिद्वारला जाऊन आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. 

हेमंत गोयलचे वकिल राम कुमार म्हणाले की, एसएचओमुळे हेमंत कुमारसोबत तीन वेळा मारहाण झाली आहे आणि तिसऱ्यांदा जेव्हा मारहाण झाल्यावर हेमंत गोयल तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा एसएचओने त्यांना गायत्री मंत्र लिहून दिला. आणि सांगितले की, १०८ वेळा याचा जप करा. सोबतच पूजा करण्यासही सांगितले.

तेच पीडित हेमंत गोयलने मीडियासमोर आपली अडचण सांगितली. ते म्हणाले की, त्यांची पत्नी आणि सावत्र मुलगा त्यांना मारहाण करतो. त्यांना घरातून काढण्यात आलं आहे. त्यांच्या घरावर कब्जा करण्यात आला आहे.  ते म्हणाले की, त्यांचं लग्न सविता कौशिकसोबत जबरदस्ती लावण्यात आलं होतं. ते म्हणाले की, म्हातापणाचा सहारा म्हणून त्यांनीही हे लग्न केलं. हे प्रकरणाची तक्रार करण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा त्यांनी गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, याने अडचणी दूर होतील. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी