शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

पत्नींचा सिरिअल किलर...! पहिलीचा रहस्यमयी मृत्यू, दुसरी भाओजीच्या भावासोबत पळून गेली, तिसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:45 IST

औरंगाबादच्या शेखपुरा गावातील हे प्रकरण आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद : बिहारच्या औरंगाबादमध्ये एका पतीची धक्कादायक कृत्ये समोर आली आहेत. लग्न झालेल्या व्यक्तीची कहाणी विचित्र आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचा रहस्यमयी मृत्यू झाला आहे. दुसरी भावोजीच्या भावासोबत पळून गेली तर तिसरीचा त्याने खून केला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

या व्यक्तीचे नाव सुबेलाल पासवान आहे. औरंगाबादच्या शेखपुरा गावातील हे प्रकरण आहे. सुबेलालने हुंड्यासाठी तिसऱ्या पत्नीचा छळ केला होता, यानंतर तिची हत्या केली होती. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह देखील जाळला होता. स्थानिक लोक त्याला पत्नींचा सिरिअल किलर म्हणत आहेत. 

लोकांच्या म्हणण्यानुसार सुबेलालकडे कोणतीही पत्नी थांबत नाही. एकतर तिचा रहस्यमयी मृत्यू होतो किंवा ती पळून जाते. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या आईच्या जबाबावरून एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात अर्ज दिल्याचे उपरा पोलिस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले. 

आई कुस्मी देवीने म्हटले आहे की, तिने आपली मुलगी चंद्रावती हिचा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार सुबेलालसोबत 4 वर्षांपूर्वी केला होता. ऐपतीनुसार हुंडाही दिला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. त्यानंतर सुबेलालने माझ्या मुलीवर पैसे आणि हुंड्यासाठी अत्याचार करण्यास सुरुवात केली. यातूनच गुरुवारी त्याने मुलीची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. 

सुबेलाल पासवान याचा पहिला विवाह 2002 मध्ये झाला होता. 2003 मध्ये त्यांना मुलगी झाली. 2004 मध्ये तिचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर त्याने तियप गावात राहणाऱ्या जलेंद्र पासवान यांची मुलगी ममता कुमारीसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर आरोपी सुबेलालने पत्नी ममता कुमारीला गुजरातमधील दमण घेऊन गेला. एका खासगी कंपनीत काम करत होता. तेथेही तो पत्नीशी भांडण करत असे. वैतागून पत्नी भावोजीच्या भावासोबत पळून गेली.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीBiharबिहार