शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पदोन्नती लांबल्याने वरिष्ठ निरीक्षकांमध्ये अस्वस्थता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:28 IST

निश्चितीनंतरही महिनाभराचा विलंब ‘सेंटीग’साठी रखडल्याच्या तक्रारी

ठळक मुद्देसोमवारी ३१आयपीएस अधिकाऱ्यांसह ८९ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या झाल्या. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना ‘मोक्या’च्या ठिकाणी पोस्टिंग देण्यासाठी निश्चित करण्यात येत आहे.

मुंबई -  पोलीस दलातील २८,३० वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहचले असताना सहाय्यक आयुक्त/उपअधीक्षक पदाच्या बढतीला ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने राज्य पोलीस दलातील शंभरवर अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विशेष म्हणजे बढतीसाठी त्यांच्या निश्चितीला महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचे आदेश लागू करण्यात आलेले नाही.गेल्या गुरूवारी राज्यातील १०१ सहाय्यक उपायुक्ताच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी ३१आयपीएस अधिकाऱ्यांसह ८९ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या झाल्या. त्यामुळे निरीक्षकांच्या बढतीचे आदेश लवकरच होतील, अशी आशा असताना त्याबाबतची प्रतिक्षा वाढत चालली आहे. जुलै महिन्याच्या दुसरा पंधरवडा सुरु झाल्याने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवातही झाली. मात्र नियुक्तीचे ठिकाण निश्चित न झाल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या पाल्याच्या प्रवेशही प्रलंबित राहिले आहेत. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना ‘मोक्या’च्या ठिकाणी पोस्टिंग देण्यासाठी निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या आदेशाला विलंब होत असल्याच्या तक्रारी संबंधित अधिकारी वर्गातून होत आहे.राज्य पोलीस दलात १९८८ व ८९ साली उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या १०१ अधिकाऱ्यांची ही व्यथा आहे. बऱ्याच जणांच्या रिटायरमेटला २, ३ वर्षे शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक पदाची बढती लवकर व्हावी, यासाठी गेल्या ८ ते ९ महिन्यापासून ते प्रतिक्षेत आहेत. पोलीस मुख्यालय व गृह विभागाकडून त्याबाबत होणाऱ्या दप्तर दिरंगाईबाबत अधिकाऱ्यांची नाराजी वर्तमानपत्रातून त्याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर गेल्या १५ जूनला १०४ अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली. त्यापैकी ३० जूनला रिटायर होणाऱ्या ३ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. उर्वरित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल, संवर्ग निश्चिती होवून ८ ते १० दिवसामध्ये पदोन्नतीचे आदेश जारी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आजतागायत त्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामध्ये या महिन्याच्याअखेरीसही काही अधिकारी सेवा निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांना ३० जुलैपर्यंत बढतीचे आदेश काढले जातील की नाही, याबाबत धास्ती निर्माण झालेली आहे.  

 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPoliceपोलिस