शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 21:55 IST

Crime News : मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासानंतर परत मिळवून दिले .

 मीरारोड - मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासा नंतर परत मिळवून दिले . रिक्षाचालकाने दागिने व कपडे थेट आपल्या उत्तर प्रदेश येथील गावी नेऊन ठेवले होते.भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्क मध्ये राहणारे तुकाराम कदम यांच्या मुलीचे जेसलपार्क येथील सभागृहात ११ डिसेम्बर रोजी लग्न होते . सकाळी त्यांच्या पत्नी ह्या अडीच लाखांचे दागिने व कपडे घेऊन रिक्षातून पोहचल्या . परंतु घाई गडबडीत उतरताना दागिने व कपड्यांची पिशवी रिक्षातच राहिली .दागिने व कपडे रिक्षात राहिल्याचे लक्षात आल्यावर नवघर पोलिसात या बाबत फिर्याद दिली होती . पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे सह भालेराव , शिंदे जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला .पोलिसांनी आधी त्या रिक्षाचा क्रमांक शोधून काढला . त्या आधारे रिक्षा मालकाला गाठून चौकशी केली असता त्याने सदर रिक्षा हि मूळचा उत्तर प्रदेशचा पण काशीमीरा येथे राहणारा रिक्षा चालक मोहम्मद मकसूद अली ह्याला चालवण्यास दिल्याचे सांगितले .पोलिसांनी मकसूदच्या घरी तपासणी केली असता तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी गेला होता . पोलिसांना ११ जानेवारी रोजी मकसूद हा गावा वरून आल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली . अखेर रिक्षात दागिने व कपड्यांची सापडलेली ती पिशवी आपण मूळगावी नेऊन ठेवल्याचे त्याने कबूल केले .पोलिसांनी त्याला मूळ गावा वरून दागिने व कपड्यांची पिशवी आणायला लावली . २० जानेवारी रोजी कदम यांचे दागिने व कपडे पोलिसांच्या ताब्यात आले . नवघर पोलिसांनी लग्ना वेळी गेलेले दागिने महिन्या भरा नंतर कदम कुटुंबियांना मिळवून दिल्या बद्दल कटुक होत आहे . परंतु पोलिसांनी मकसूद वर मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर