शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईच्या महिलेची लग्नासाठी राजस्थानमध्ये केली विक्री; सुटकेसाठी दोन लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:40 IST

कुरार पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

मुंबई : कॅटरिंगचे काम मिळवून देतो, म्हणून मुंबईच्या विवाहितेला राजस्थानमधील एका गावात नेले. तेथे वेश्याव्यवसायात ढकलण्याची भीती घालून, महिलेचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर सुटकेसाठी तिच्या कुटुंबाकडे दोन लाखांची मागणी केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली. कुरार पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करत, महिलेची सुटका केली.

या प्रकरणात पोलिसांनी विवेक उर्फ विक्की रामानंद जागीड (२२), मुकेशकुमार बद्रीप्रसाद जांगीड (३७), कृष्ण कुमार (३३), परवीनकुमार जांगीड (३३), कविता प्रताप जाधव उर्फ सलमा अकबर भट्टी (३५), कुसुम उर्फ रेखा राजू शिंदे उर्फ रेखा दौलत निकम (४५) यांना अटक केली.

२ नोव्हेंबरला घरी आलेल्या कुसुमने तक्रारदार विवाहितेला गुजरात, राजस्थानमध्ये कॅटरर्सचे काम मिळून देते, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला, महिलेनेही कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, म्हणून कुसुमला होकार दिला. ५ नोव्हेंबरला कामाच्या पाहणीसाठी टेÑनने कोसंब गुजरात येथे नेऊन ४ दिवस ठेवले. त्यानंतर, कुसुम व राजूने तक्रारदार महिलेस अहमदाबाद रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीसह गोडसा येथे पाठविले. पुढे विजय, कुसुम व राजू यांनी तिला कविताच्या घरी नेले. तेथे तिला १० दिवस ठेवले. तेथे प्रवीणने ३ ते ४ इसमांना तिला दाखविले. पुढे ते दाखवतील त्या व्यक्तीशी लग्न न केल्यास वेश्याव्यवसायात ढकलण्याची धमकी दिली. जबरदस्तीने तिचे ४० वर्षांच्या मुकेश कुमारसोबत लग्न लावून दिले. ‘मला घरी सोडा,’ अशी विनंती करूनही संबंधित महिलेवर अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली.

पैशांसाठी केला मुलाला फोन

२ डिसेंबरला मुकेशने महिलेच्या मुलाला फोन करून आई हवी असल्यास दोन लाख देण्याची मागणी केली. मुलाने पोलिसांत तक्रार दिली. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक, महिला पोलीस अंमलदाराने शिताफीने तपास करत, महिलेची सुटका करत आरोपींना अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी